तरुणांमध्ये धुम्रपान आणि व्यासनाधिनतेमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढते

31

🔹कॅन्सरला आयुष्याचा ताबा घेऊ देऊ नका

🔸 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रूडे यांनी व्यक्त केले विचार.

✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.6फेब्रुवारी):-तरुणांमध्ये कॅन्सर गेल्या 10 वर्षांमध्ये कॅन्सरची प्रकरणं 25 टक्क्यांनी वाढली आहेत तर यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून येते.मेडिकल जर्नल ऑफ ऑन्कॉलॉजीने 1990 ते 2016 दरम्यान केलेल्या संशोधनात ही गोष्ट आढळली आहे.ब्रेस्ट इंप्लांटमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती असणं आवश्यक आहे .वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते कॅन्सर हा दुसरा असा आजार आहे की, ज्यामुळे जगभरात सर्वांत जास्त लोकांचा मृत्यू होतो.कॅन्सर हा वाढत्या वयात होणारा आजार असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. पण तरूण लोकां मध्येही आता कॅन्सर आढळल्याचं प्रमाण वाढल्याचं समोर येते.यापैकी 40 टक्के प्रकरणांमध्ये कॅन्सरचा संबंध तंबाखू सेवनाशी आहे.

आता तर 20-25 वर्षांच्या तरुणांमध्येही हा आजार आढळतो.
“तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांमध्ये सेवन सुरू केल्याच्या 10 -12 वर्षांनंतरच कॅन्सर आढळतो. जे स्मोकलेस टोबॅको म्हणजे पान, तंबाखू, खैनी, गुटखा सारख्या गोष्टींचं सेवन करतात. अगदी कमी वयात, या गोष्टींमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती नसतानाच या तरुणांनी सेवन सुरू केलेले आहे ” कोलोन आणि स्तनाच्या कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 30 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचं वय 35 पेक्षा कमी असल्याचे दिसून येते.तर कॅन्सरचा संबंध जीवनशैलीशी असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी व्यक्त केले.युरोप आणि अमेरिकेने तंबाखू सेवन रोखण्यासाठी कठोर पावलं उचलल्यानंतर तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.

तंबाखू सेवनामुळे लोकांना ओरल म्हणजेच तोंडाचा, पॅनक्रिएटिक म्हणजेच स्वादुपिंडाचा, सर्विक्स (गर्भायशाचं मुख), ओव्हरीज म्हणजेच अंडाशय, लंग – फुफ्फुसं आणि ब्रेस्ट म्हणजेच स्तनाचा कॅन्सर होत असल्याचे सांगितले. सामान्य व्यक्ती, सरकार आणि मीडीयाने ही गोष्ट गांभीर्याने घेतल्यास कॅन्सरवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असेही ते म्हणाले.कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे व्यक्तीच्या उंचीपेक्षा त्याचं वजन जास्त असणं, फळं आणि भाज्यांचं कमी सेवन, व्यायाम न करणं, तंबाखू आणि दारूचं सेवन या गोष्टींमुळे होत असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलें आहे .भारतामध्ये कॅन्सरची 15.86 लाख प्रकरणं आढळली असून या रुग्णांच्या उपचारांसाठी सर्जरी, रेडिओथेरपी, किमोथेरपी आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच वेदना कमी करणाऱ्या सुविधा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

जीवनशैली, लोकांमध्ये वाढणारी स्थूलता, सरासरी आयुष्यमानात वाढ आणि तपासणीसाठीच्या सुविधांमध्ये झालेली वाढ या सगळ्यांमुळे भारतात कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळत असल्याचेही मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रूडे यांनी व्यक्त केले आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे म्हणाले की, स्वातंत्र्य काळात भारतातलं सरासरी आयुष्यमान 40-45 वर्षं होते. आता ते वाढून 65-70 वर्षं झालंय. भारतात आधी कुपोषण आणि संसर्गामुळे होणारे आजार आढळतात पण आता ते बहुतांश प्रमाणात आटोक्यात आणण्यात आले आहेत. लोकसंख्येसोबतच तपासणीसाठीच्या सुविधाही वाढल्याचं म्हटले आहे.जर्नल ऑफ ग्लोबल ऑन्कॉलॉजीनुसार भारतातल्या मध्ययुगीन काळात कॅन्सरचा उल्लेख कमी आढळतो, पण कॅन्सरची प्रकरणं आढळल्याचे अहवाल 17 व्या शतकापासून यायला सुरुवात झाली होती.

सन 1860 आणि 1910 दरम्यान भारतीय डॉक्टर्सने केलेल्या तपासण्या, त्यांचे निष्कर्ष आणि कॅन्सरच्या प्रकरणांच्या अहवालांचे भाग प्रसिद्ध झाले होते.महिलां मधिल कॅन्सर’द ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी’ (1990-2016) नुसार भारतातल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं सर्वांत जास्त आढळली आहेत.या अभ्यासानुसार महिलांमधील स्तनांच्या कॅन्सरनंतर सर्व्हिकल कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, कोलोन आणि रेक्टम आणि लिप अॅण्ड कॅव्हिटी कॅन्सरची प्रकरणं सर्वांत जास्त समोर येत आहेत.”गावं आणि शहरांमध्ये तुलना केली तर गावांमध्ये सर्व्हिकल आणि शहरांमध्ये स्तनाच्या कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळतात. पण संपूर्ण भारतातच महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर सगळ्यांत जास्त आढळतो. उशीरा लग्न होणं, उशीरा होणारी गर्भधारणा, स्तनपान कमी करणं, वाढता तणाव, जीवनशैली आणि स्थूलपणा ही यामागची कारणं आहेत.”वजन वाढताना पोटावर चरबी जमा होते त्यामुळे पित्ताशय, स्तनांचा कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरची प्रकरणं आढळतात.

कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने कधीही धूम्रपान केलेलं नाही. त्यामुळे हे प्रदूषणामुळेच झाल्याचं मान्य करण्याशिवाय पर्याय नाही.कॅन्सरसाठी धुम्रपानाखेरीज प्रदूषणही जबाबदार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.End of पॉडकास्ट
2035 पर्यंत कॅन्सरची प्रकरणं वाढतील आणि ही संख्या 10 लाखांवरून वाढून 17 लाख होईल असं लॅन्सेट जर्नलमध्ये म्हटले आहे.तर जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजीनुसार भारतामध्ये 18 लाख रुग्णांमागे फक्त 1600 तज्ज्ञ उपलब्ध आहेत. म्हणजे सरासरी 1125 कॅन्सर रुग्णांसाठी एक कॅन्सर तज्ज्ञ उपलब्ध आहेत.

कॅन्सरमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो – एक तर त्या रुग्णाचं कुटुंब आणि दुसरं म्हणजे भारताचं आरोग्य बजेट.यासाठीच नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG)ची स्थापना करण्यात आली आहे. एनसीजी देशभरातल्या सरकारी आणि बिगर-सरकारी हॉस्पिटल्सचा गट आहे. या गटाने ‘नव्या’ ने स्थापना केली असून ही संस्था रुग्ण आणि गरजूंपर्यंत तज्ज्ञ आणि त्यांचे उपचार पोहोचविण्यासाठी प्रयत्न करते.एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कॅन्सरपीडित असेल तर त्याच्या उपचारांसाठी 40-50% लोक कर्ज घेतात किंवा मग घर विकतात. 3 ते 5 टक्के लोक या उपचारांमुळे दारिद्र्यरेषेखाली जातात असं लॅन्सेटमध्ये म्हटलें आहे.केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत कॅन्सरचाही समावेश करण्यात आल्याने लोकांना याचा फायदा होईल .

सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू झाली. याद्वारे रोगांच्या उपचारासाठी मदत केली जाते. यामध्ये आता कॅन्सरचाही समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेद्वारे लाभार्थीला पाच लाख रुपयांपर्यंतचा सहाय्यता निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.“गरीबांना उपचारांसाठी मोठ्या शहरांत जावे लागू नये यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आलेली आहे. रोगाचं निदान झाल्याबरोबर उपचार सुरू होतील, यासाठी नॅशनल कॅन्सर ग्रिड तयार करण्यात आलंय. यामध्ये 170 कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना खासकरून कॅन्सर पेशंट्ससाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असला तर कोणत्या चाचण्या कराव्या लागतील आणि उपचार कसे असतील, याची माहिती यात आहे. सोबतच केल्या तीन-चार वर्षांमध्ये कॅन्सर रिस्पॉन्स सिस्टीम तयार करण्यात आली आहे. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी एखाद्या प्रकारच्या कॅन्सरबद्दल पूर्ण माहिती देऊन उपचार करता यावा आणि त्या रुग्णाला मोठ्या शहरात जावे लागू नये, हा यामागचा उद्देश्य आहे. या ग्रिडला आयुष्यमान योजनेशीही जोडण्यात आले त्यामुळे रुग्णाला योजनेमार्फत आर्थिक मदतही मिळेल.”आयुष्यमान भारत योजनेचा कॅन्सर रुग्णांनाही फायदा होतो. कॅन्सरची औषधं महाग असल्याने सरकारच्या नॅशनल फार्मस्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीने कॅन्सर रुग्णांसाठी ट्रेड मार्जिन 30 टक्क्यांवर सीमित केलेली आहे. असे मतही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रूडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.