गडचांदुर शहरातील अवैध दारू विक्री बंद करा ठाणेदारांना निवेदनाद्वारे मागणी

31

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.21मे):–गडचांदुर येथील वार्ड क्रमांक 6 वैशाली नगर येथे अवैध देशी दारुची विक्री करणा-या ईसमावर कायदेशीर कारवाई करुन दारुची विक्री तातकाळ बंद करावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे, गेल्या दोन वर्षा आधी कोरोना काळात काही ईसम चोरीछुपे अवैध मार्गाने देशी दारूची विक्री करून आपला प्रपंच भागवायचे, वार्डा वार्डात ठिकठिकाणी दारू विक्री होत असलयाने नागरीक दुर्लक्ष करायचे, मात्र कोरोना संपल्यावर कारवाईच्या भीतीने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दनानले मात्र काही दारू विक्रेता काहीँ पोलीस मित्रांशी हातमिळवणी करून आजही बिनधास्त पणे अवैध दारू विक्रीचा गोरख धंदा करीत आहे.

हा गोरख धंदा बंद करून शांतता अबाधित राखणयासाठी काही नागरीकांनी प्रयत्न केले परंतु दारू विक्री बंद करणयात अपयशी ठरले, काही नागरिक चूप राहणेच पसंद केले, देशी दारू दुकान परवाना धारकांचे दारू विक्रीची वेळ सकाळी दहा ते रात्री दहा अशी आहे, मात्र येथे रात्र भर फूल टाईम दारु मिळत असल्याने मद्यपी चे रात्री दहा नंतर ते पहाटे पाच प्रयंत चकरा सूरू असतात या अवैध दारू विक्री मूळे वार्डातील नागरीकांची चांगलीच झोपमोड झाली असून नागरीकात नैराश्येचे वातावरण पसरले आहे, कूटुंबाचा कर्ताच “फुल टाईट”राहत असेल तर कुटूंबातील लोकांवर* *उपासमारीची वेळ आल्यासिवाय राहणार नाही, अशी अवस्था येथे बघायला मिळत आहे.

कोरोना काळापासून सुरू असलेला अवैध दारुचा धंदा बंद करण्यात येऊन दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई व्हावी वार्डात शांतता राखणयासाठी मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सरचिटनिस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार पांडूरंग ईदे, सेवानिवृत्त शिक्षक शाम सुंदर भोंगडे, चंपत गोहोकार, विलास सिरसागर,चंद्रकला ओझा, अरविंद शंभरकर, अतूल ताजने, जोगेंद्र टेकाम दतु पिंगे इत्यादीनी मा, ठाणेदार रविंद्र शिंदे यांची भेट घेऊन निवेदना दवारे मागणी केली आहे*