मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी – शिवबा संघटना नांदेड जिल्हाअध्यक्ष गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर

29

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.9ऑक्टोबर):-महाराष्ट्रात मराठा समाजाने वेगवेगळ्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा दिला अनेक वेळा लाखोचे मूक मोर्चे काढून शासनाला कुठल्याही शासनाच्या संपत्तीचे कुठलेही नुकसान न करता शांत व शिस्तीत लाखोचे मूक मोर्चे काढून मराठा समाजाच्या भावना त्यांनी आतापर्यंत शासन दरबारी कळवले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मराठा तरुण बांधवांनी बलिदान दिले आहे पण आरक्षण न मिळाल्यामुळे व आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आता मराठा समाज मूक मोर्चे किंवा धरणे आंदोलन काढून स्वस्त बसणार नाही त्यासाठी लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी गायकवाड समितीने दिलेले पाठ पुरावे तात्काळ सादर करून मराठा समाजाचा सरळ सरळ ओबीसी संवर्गात समाविष्ट करण्यात यावा व आरक्षणावर दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी.

सध्या असलेल्या महा विकास आघाडी सरकारने न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांनी मराठा समाज आरक्षणास पात्र आहे व मराठा समाजातील नवतरुण शैक्षणिक क्षेत्रात व आर्थिक मागासलेला असल्याचे न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांनी सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना त्यांनी प्रत्यक्षात जाणून घेऊन मराठा समाज आरक्षणास पात्र आहे असे सांगितले होते तसा अहवालही त्यांनी राज्य शासनाला व कोर्टात सादर केले होते तसेच मराठा समाज राज्यघटना कलम ३४० मधील आरक्षणास पात्र ठरला आहे.

आतापर्यंत मराठा समाजाने लोकशाही मार्गाने व आपल्या सहानुभूती प्रमाणे मागण्या करीत होते यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून आरक्षणासाठी काहीही करण्यास तयार आहे आता मूक मोर्चा नसून यानंतर ठोक मोर्चे काढून प्रत्येक खासदार आमदार आणि मंत्र्यांना धडा शिकवणार आहे त्यासाठी आपण वेळीच मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही.

तोपर्यंत मराठा समाजाचे ठोक मोर्चा चालूच राहणार मराठा समाजावर वेळोवेळी अन्याय होत असल्यामुळे मराठा समाज बांधव शासनाविरोधात नाराजीचे सूर निघत आहेत त्यामुळे न्यायमूर्ती एम.जी गायकवाड आयोगाने सरळ व स्पष्ट पणे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र असल्याचा अहवाल सादर केला आहे त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी शिवबा संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख गोविंद पाटील मोरे आचोलीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख गोविंद पाटील मोरे यांची स्वाक्षर्‍या आहेत.