पैठण तालुका येथील जायकवाडी धरणा नजीक भूकंप मापन यंत्र बसविण्यात यावे यासाठी निवेदन – सौ.अनिता वानखेडे

32

✒️विजय कांबळे(पैठण प्रतिनिधी)मो:-8454021607

पैठण(दि.19ऑक्टोबर):- तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे सौ. अनिता वानखेडे यांनी पुन्हा शहरातील नागरिकांच्या सुरेक्षतेसाठी जायकवाडी धरणातील भुकपमापन यंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. व तात्काळ दुरूस्त करणे किंवा यंत्र नविन बसविणे सध्या धरण 100% पाण्याने भरले असुन जर भविष्यात कोणतीही हानिकारक परिस्थिती उद्भवू शकते तरी हे भूकंप मापक यंत्र बसवणे तात्काळ गरजेचे आहे.

व ह्या सर्व गोष्टी वर दुर्लक्ष फक्त कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त नसल्याने ढिसाळपणे नियोजन होत आहेत. मे. साहेबांनी संबंधित विभागाच्या योग्य ती कार्यवाही निर्माण होणार नाहीत या साठी योग्य तो निर्णय आपल्या स्थरावरून घ्यावा ही नम्र विनंती केली आहे. तसेच हे निवेदन पत्र अधिक्षक अभियंता यांनी स्वीकारले नाही. निवेदन पत घेण्यास नकार देत शेवटी श्री. राजेंद काळे यांनी अर्ध्या तासाने ना इलाजाने निवेदन पत्र आवक जावक विभागाला देण्यात आले.