आंध्रप्रदेशच्या सत्ताधाऱ्यानी कोविड रुग्णासाठी मोफत सुविधा चालू केली आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते रुग्णाला वाऱ्यावर सोडले – गजानन पाटील चव्हाण

27

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.6मे):-राज्यात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घालून अनेक लोकांचा बळी घेतला असताना सुद्धा महाराष्ट्रातील सत्ताधारी पुढाऱ्यानी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णासाठी काय केले असा प्रश्न करीत महाराष्ट्र राज्याच्या २० किलोमीटर सीमेच्या अंतरावर असलेल्या आंध्राप्रदेशच्या मुखमंत्र्यानी कोविड रुग्णासाठी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून दिले तर राज्यात राज्य कर्त्यांनी कोविड रुग्णाला वाऱ्यावर सोडले असे मत सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क शी बोलताना व्यक्त केले आहे

सध्या देशासह अनेक राज्यात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असल्याने आंध्रप्रदेश व तेलंगाणा या राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी शासकीय निमशासकीय हॉस्पिटल मोफत उपलब्ध करून दिली असून महाराष्ट्रातील राजकीय नेते फक्त कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन टाकण्यापेक्षा दुसरे कांहीच केले नाही रुग्णाला बेड नाहीत ते सुद्धा नेत्यांनी उपलब्ध करून दिले नसल्याचे खंत गजानन चव्हाण व्यक्त केले आहे

कोविड रुग्णाचे उपचारा दरम्यान लाखो रुपये खर्च झाले असताना सुद्धा शासनाच्या सोयी सुविधा वाऱ्यात विरगळल्या की असा प्रश्न करीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णासाठी मोफत सुविधा चालू कराव्यात असे गजानन पाटील चव्हाण यांनी म्हणाले असले तरी जिल्ह्यातील पुढा ऱ्यानी शासकीय दवाखान्यात कोविड रुग्णासाठी अतिशय महत्वाचे इंजेक्शन सुद्धा उपलब्ध करून दिले नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून हात पाय जोडून इंजेकशन खरीदी करावे लागत आहे

राज्यातील राजकीय पुढारी माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असो की खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असो माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण असो अथवा नायागांव विधान सभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार असो यांनी कोविड रुग्णासाठी काय केले लाखो रुपयाची खाजगी कोविड सेंटर कडून लूट केली जात असताना सुद्धा जिल्ह्यातील पुढारी आपल्याच तोऱ्यात दौडताना दिसत आहेत

आंध्रप्रदेशचे उदाहरण घेतले तर महाराष्ट्रातील
सत्तेवर असलेले सरकार कोविड रुग्णासाठी
कोणत्या सुविधा राबविल्या हे जनतेला सांगण्याची वेळ नेत्या पुढे असून खरे तर आंध्रप्रदेशच्या सत्ताधाऱ्यानी कोविड रुग्णासाठी मोफत सुविधा चालू केली आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते रुग्णाला वाऱ्यावर सोडले असे ही गजानन पाटील चव्हाण म्हटले असून गेल्या विधान सभेच्या निवडणुकीच्या वेळेस विकासापासून कोसो दूर असल्याकारणाने धर्माबाद तालुक्यातील गावे तेलंगणा राज्याला जोडण्यात यावे म्हणून मागणी केली होती त्या प्रमाणेचे तसेच महाराष्ट्र सरकारने व सर्व पुढाऱ्याने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा नांदेड जिल्हा सुद्धा तेलंगणा राज्याला जोडण्यातसाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी दिला आहे