✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)
हिंगणघाट(दि.24मे):-कोरोना विषाणू मुळे अनेक परिवारातील लोक मृत्युमुखी पडलेले आहे.त्यांचे घरावर आर्थिक बोझा वाढत आहे अश्या वेळेस शासनाने कोरोणा विषाणू मुळे मृत्यू मुखी पडलेल्याना त्यांचे मुलांचे शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासनाने करावा तसेच मरणाराच्या कुटुंबातील अपत्यास शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे. त्यांचे वारसाना 10000 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी.
अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हा मुख्या अधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, राजेश खानकूरे, जिवनभाऊ उरकुडे, चारू आटे, मायासिग टाक हे उपस्थित होते..