रणमोचन गावाचे पुनर्वसन करा :- गावकऱ्यांची मागणी

28

🔸मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.21जून):- ब्रम्हपुरी तालुक्यातील रनमोचन हे गाव वैनगंगा नदिच्या तिरावरती ( ब्रम्हपूरी -आरमोरी रोड) लगत आहे. दरवर्षी होणा-या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे नदिला पाणी वाढते व दरवर्षी गांव पाण्याखाली येतो.तसेच शेतशिवाराची देखील नुकसान होत असतो. यावर्षी 29 ऑगस्ट 2020ला गोसीखुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला महापूर आला. त्यात रणमोचन गावातील अनेक घरे व शेतपिके वाहून गेले, त्यामुळे अनेक कुटूंब बेघर झाले व खाण्या पिण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याच लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रणमोचन गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावी.

याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, जि. प.सदस्य प्रा. डाँ. राजेश कांबळे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकरजी सेलोकर, सरपंच निलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर, अधिकराव पिलारे, श्रावणजी तोंडरे, किशोर पिलारे, विठ्ठलजी सहारे, सदाशिव मेश्राम व अन्य गावकरी उपस्थित होते.