समाजाने एकसंघ होऊन विकासात्मक मार्गाचा अवलंब करावा- महेंद्र मानकर

38

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.18जुलै):- समाजाने एकसंघ होऊन सकारात्मक विचार ठेवून विकासात्मक मार्गाचा अवलंब केल्यास समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आर.पी.आय.आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी केले.ते स्थानिक सुमेधबोधी बुद्ध विहारांमध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल डाखोरे, सुभाष वाठोरे, वीरेंद्र खंदारे, राहुल काळबांडे, भीमराव सोनुले, संतोष निथळे, राजू धुळे, मारुती कोकणे हे होते.

सुरुवातीला महेंद्र मानकर यांचा विहार समितीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना मानकर म्हणाले, समाजामध्ये नकारात्मक विचारसरणीचा प्रभाव जास्त असल्यामुळे समाजाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समाज विकासाचा मार्ग दिला त्या मार्गांचे अवलंब करून, सकारात्मक विचार ठेवून आपलं हित कशात आहे या गोष्टीचा विचार करून समाजाने आचरण केल्यास समाजाचा निश्चितच विकास होईल असेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संतोष निथळे यांनी तर आभार राहुल काळबांडे यांनी मानले.