हर घर तिरंगा-घर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे सातारा जिल्ह्यातील ७००० कुटुंबानं पर्यंत पोहोचण्याचा संकल्प – अभाविप

28

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)

सातारा(दि.13ऑगस्ट):-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात ‘एक गाव-एक तिरंगा’ हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात योजना करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात देखील ११ तालुक्यांसाठी ही योजना करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात २१ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम व ३७९ गावातील २५०० कुटुंबात भारत माता प्रतिमा पूजन व ‘घर घर तिरंगा – मन मन तिरंगा’ हे ब्रीद घेऊन ७० घरावर राष्ट्र ध्वज लावण्यात येणार आहेत. वस्ती, शहर, गाव व तालुकासाठी अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबादारी देण्यात आलेली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आगामी वर्षभर विद्यार्थी परिषद देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे त्याच प्रमाणे सोशल मीडिया द्वारे , मेसेज कॉल सेंटर च्या माध्यमातून नागरिकांना संपर्क करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात विविध ७५ कार्यक्रमांची योजना वर्षभरासाठी करण्यात आल्याची माहिती सातारा अभियान प्रमुख स्वप्नील जगताप यांनी प्रसार माध्यमांना दिली. सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ,सामाजिक मंडळे , व्यायाम शाळा, सामाजिक संस्था व नागरिकांनी या अभियानांतर्गत सार्वजनिक ध्वजारोहण व भारत माता पूजनाचे कार्यक्रम कोरोना नियमांचे पालक करून करावेत असे आवाहन अभाविप कडून करण्यात आले. तसेच एक गाव-एक तिरंगा या अभियानाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक गौरी वाघ , सहसंयोजक अजय मोहिते अभियान प्रमुख स्वप्नील जगताप, शहर मंत्री निखिल चव्हाण,आकाश शेडगे , अमोघ कुलकर्णी हे उपस्थित होते.