मातंग समाजावर बोरगाव (माळशिरस) येथे झालेल्या अन्यायाचा जाहीर निषेध; यापुढे मातंग समाजावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही – रिपाई (आठवले)

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27ऑगस्ट):बोरगाव(माळेवाडी),ता.माळशिरस,जी.ससोलापूर येथे मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांचे अपंग भावाचे निधन रात्री 2 वाजता झाले.गावातील काही गावगुंडांनी मयत स्मशानभुमीत दहन करण्यास मनाई केली.अशा प्रकारे माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रात मध्ये घडली. तरी प्रशासनाने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी. संबंधित कुटुंबातील लोकांना पोलिस प्रोटेक्शन द्यावे असे निवेदन रिपाईच्या वतीने वडूज तहसीलदार यांना देणेत आले.

सदर घटना घडली त्यावेळी तेथील स्थानिक पोलीस स्टेशन चे अधिकारी यांची भूमिका संशयास्पद आहे.तरी त्यांची देखील चौकशी करावी. हे निवेदन देताना रिपाईचे (आठवले) गटाचे.खटाव ता. कार्याध्यक्ष गणेश भोसले, जिल्हा नेते अजित नलावडे, कॉंग्रेस पक्ष चे अल्पसंख्याक आघाडी चे ता.अध्यक्ष दाऊद मुल्ला, नेते दत्ता शिंदे, नेते संदीप काळे, महेंद्र माने,सरपंच सुनिल वायदंडे, अजित रायबोळे,