हजारो वर्षांपासून अमावस्येच्या दिवशी बंद राहत असलेला शेत माल विक्री सुरू करणाऱ्यांचा सत्कार

29

🔹अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम : परंपरेला दिला छेद

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.20सप्टेंबर):- हजारो वर्षांपासून अंधश्रद्धा मनात बाळगून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव अमावस्याच्या दिवशी बंद ठेवत होते परंतु येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून सभापती वसंतराव उत्तमराव पवार यांची निवड झाली त्यांनी व सचिव कैलास व्यापारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करून मनुवादी विचारांना मुठ माती दिली
अमावस्याचा दिवशी शेतमाल विक्री सुरू केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांचा येवला शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाजार समितीत जाऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांचे अभिनंदन करणारे पत्रही देण्यात आले.

त्या पत्राचा मजकूर असा – भारत हा कृषी प्रधान देश आहे मात्र आज या देशातील शेतकरी अनेक कारणांमुळे मेटाकुटीस येऊन तो अत्यंत नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहे या बळीराजाच्या आयुष्यात अनेक अनिष्ट रूढी परंपरा मुळे देखील संकटे येत असतात अर्थातच त्याचे जीवन परावलंबी आणि कष्टमय झाले आहे म्हणजे त्यांचे जगणे नैसर्गिक आपतींबरोबर मानावनिर्मिती संकटामुळे देखील अवघड झालेले असताना त्याने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेत मालाला विक्री करण्यासाठी अमावस्येचा अडथळा होता सभापती वसंतराव उत्तमराव पवार आणि सचिव कैलासराव व्यापरे यांनी व्यापारी बंधू सोबत चर्चा करून मोठ्या धाडसाने अमावस्याचा दिवशी शेतमाल विक्री सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून घेतलेला आहेच परंतु या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये अमावस्या बाबत हजारो वर्षांपासून रुजलेली अंधश्रद्धा आणि भीती दूर सारण्याचे फार मोठे काम बाजार समितीने केली आहे. अर्थात त्यामुळे येवला बाजार समिती अभिनंदनास व गौरवास पात्र ठरली आहे.

सभापती वसंतराव पवार आणि सचिव कैलासराव व्यापरे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा.अर्जुन कोकाटे,प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे दिनकर दाणे प्रा.डॉ अजय विभांडीक ऍड दिलीप कुलकर्णी पंडित मढवाई.बाबासाहेब कोकाटे, रामनाथ पाटील, कानिफनाथ मढवाई, आप्पासाहेब शिंदे, हेमंत पाटील, शैलेश अहिरे, आदींनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केले.*