भिंती कोसळली परंतु सुदैवाने अपघात टळला…

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.30सप्टेंबर): — येथील जवळच असलेले भवरखेडे गावातील रहिवासी श्यामराव भागवत ब्राह्मणे (वय ४५) यांच्या राहत्या घराची भिंत काल मध्यरात्री १:३० च्या सुमारास कोसळली. यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही संपूर्ण कुटुंब बचावले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. भिंत ही मागील बाजूस पडली त्यावेळी श्यामराव भागवत ब्राह्मणे यांचे मोठे बंधू रामराव भागवत ब्राह्मणे व आई सायकोबाई ब्राह्मणे हे या दुर्घटनेतून बचावले. श्यामराव ब्राह्मणे यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतांना घराची भिंत कोसळल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.

शासनाकडून मला नुकसानभरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्या भरापासून पावसाचा जोर कायम होता त्यातच ही घटना घडली.सदर घटनेची पाहणी तलाठी विरेंद्र सोनकांबळे यांनी केली व संपूर्ण घटनेचा तपशील पुढील कार्यवाहीसाठी तहसिल कार्यालय धरणगाव येथे सादर करण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी सरपंच किरण गोकुळ पाटील, उपसरपंच अजय तानकु ब्राह्मणे, कोतवाल महेंद्र पाटील, मुन्ना महाजन, सिध्दार्थ ब्राह्मणे आदी उपस्थित होते.