गेवराई तालुक्यात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

25

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21ऑक्टोबर):- शहरासह परिसरात भुरट्या चोरट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने चोरटे चोऱ्या करून बिनधास्त फिरत आहेत, गेवराई तालुक्यातील राजणी येथील एका शेतकऱ्यांची गाय तर बागपिंवळगाव येथील एका शेतकऱ्यांची बैलजोडी आणि गाय काल रात्री अज्ञान चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे, गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रांजणी येथील पवन आत्माराम सावंत या शेतकऱ्यांने शेतात बांधलेली 20 हजार रुपये किमतीची गाय अज्ञान चोरट्यांनी चोरून नेली तर बागपिंवळगाव येथील ज्ञानेश्वर यशवंत सगळे या शेतकऱ्यांने रस्तेच्या कडेला असलेल्या त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या बैलजोडी व एक गाय अज्ञान चोरट्यांनी चोरून नेली आहे, या बैलजोडी व गाय ची किंमत किमान 55 हजार रुपये आहे, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञान चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे