मोर्शी वरुड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांकरिता १ कोटी ३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

32

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे हिवरखेड, सातनूर, सवंगा, येथील पाणीप्रश्न निकाली !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोर्शी(दि.20नोव्हेंबर):- वरुड तालुक्यात पाणी टंचाई बाबत येत आलेल्या समस्याचे निराकरण करण्याकरिता पाणी टंचाई भविष्यात निर्माण होऊ नये याकरीता आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून प्रत्येक वर्षी अधिग्रहनाच्या भरवशावर न बसता कायमस्वरूपी सोर्स निर्माण करणे गरजेचे असून जल जीवन मिशन अंतर्गत टंचाईग्रस्त गावातील प्रस्ताव सादर करून कायमस्वरूपी सोर्स निर्माण करण्याकरिता वरुड मोर्शी तालुक्यातील हिवरखेड, सातनूर, सवंगा, येथील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळवण्यास आमदार देवेंद्र भुयार यांना यश आले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून पाणी पुरवठा योजनेच्या या कामांना १ कोटी ३ लक्ष ५९ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे हिवरखेड, सातनूर, सवंगा, या गावाची तहान भागणार आहे.

मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील पाणी पुरवठा योजने करिता २८.५६ लक्ष रुपये, वरुड तालुक्यातील सातनूर पाणी पुरवठा योजनेकरिता २४.९८ लक्ष रुपये , सावंगा येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ५०.०५ लक्ष मंजूर करण्यात आले असून या तीन कामां करिता १ कोटी ३ लक्ष ५९ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे तसेच पिंपळखुटा मोठा, नयावाठोडा , काटपुर, वडाळा, सावंगी, टेम्भुर्णी येथील पाणी पुरवठा योजना शासनाच्या पुर्व मान्यतेस साठी प्रस्तावित केल्या आहे असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील ड्रायझोन असलेल्या व पाण्याची टंचाई असलेल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेऊन प्रकल्पाचे आराखडे तयार करून लगेच तांत्रिक मान्यता देऊन प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवून हिवरखेड, सातनूर, सवंगा, येथील पाणी पुरवठा योजनेकरिता १ कोटी ३ लक्ष ५८ हजार रुपयांचा निधि उपलब्ध करून दिल्याबद्दल हिवरखेड, सातनूर, सवंगा, येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

ग्रामीण भागामध्ये नेहमी पाण्याची टंचाई भासत असतांना महिलांकडून पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत होती. पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर व संबंधित सर्वच मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.