🔹ज्ञानज्योती सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेऊन अभ्यासाच्या क्रांतीकडे वाटचाल
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.22नोव्हेंबर):- भारत देश हा परंपरा, संस्कृती ला घेऊन चालणारा देश आहे. त्यातही भारतातील महाराष्ट्र राज्य हा संत – महात्म्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमी मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या क्रांतिसूर्याचा जन्म झाला होता. यांच्या कार्याला सूर्याच्या तेजाची उपमा दिलेली आहे कारण यांनी मुलींना शिक्षण दिलं, गोरगरिबांना, दीन दुबळ्याना शिकवल, आणि भारत देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. याच महात्म्याची दिनांक 28 नोव्हेंबर ला स्मृतिदिन आहे.