बाबा, तुमच्या चळवळीची दुर्दशा कशी झाली?

29

🔹महापरीनिर्वाण दिनाला लगाम लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे?

🔸डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापारीनिर्वान दिना निमित्याने विशेष लेख

निसर्गाचा नियम आहे जो जन्मा येतो.तो एक दिवस मृत्यू पावतो.निसर्ग नियमाने सर्वच प्राणी माणस जगतात काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्या साठी खातात.कोण किती दिवस जगला त्याला काही महत्व नाही.कसा जगला आणि काय केले त्याला जगात खूप महत्व आहे.भारतात असा एकमेव व्यक्ती आहे जो केवळ एक पाव खाऊन व दोन गिलास पाणी पिऊन शिक्षण घेत होता त्याच्या त्या परिश्रमाने त्यागाने त्याने आपले नांव अजरामर करून ठेवले तो जाऊन आज ६५ वर्ष झाले तरी त्याला देश विसरल्याला तयार नाही. असा एकमेव पुरुष नव्हे तर महापुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर त्याच्या मृत्यूला महापरिनिर्वाण दिन म्हणतात.तो बहुजन समाजा करिता दुखाचा दिवस आहे असे म्हटल्या जाते पण गेल्या काही वर्षा पासून महार,दलित,बौद्ध समाज व त्याच्या संस्था, संघटना,पक्ष महापरीनिर्वाण दिन आहे हे विसरले आहेत. महापरीनिर्वाण दिनाला जत्रेचे स्वरूप आले आहे. म्हणून म्हणतो बघाना बाबा तुमच्या चळवळीची दुर्दशा कशी झाली
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार समाजाने वाजोटे ठरविले आहेत.

या देशातील विविध जाती धर्माचे प्रांताचे लोक भारतीय संविधानाने एकत्र राहू शकतात असे अनेक विचारवंत सांगतात. बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाचा उठता बसता जय जयकर करतात. हे जर शंभर टक्के खरे आहे.तर आंबेडकरी समाज एकसंघ का राहू शकत नाही.ज्यांनी ज्यांनी संविधान स्वीकारले त्याचा स्वभिमान जागा झाला आहे. त्याचे कल्याण व विकास झाला आहे. त्यामुळेच विविध संस्था,संघटना,पक्ष निर्माण होतात चौकटीत काम केले तर वाढतात.नाही केले तर संपतात.बाबासाहेबाच्या समता सैनिक दलाच्या धर्तीवर राष्टीय स्वयंसेवक संघ (आर एस एस) निर्माण झाली असे सांगितल्या जाते.त्याच्या हजारो वेगवेगळ्या संस्था संघटना असल्या तरी त्याचे सामाजिक,शौक्षणिक, राजकीय उधिस्ट एक असते.म्हणून ते किती हि वेगवेगळे असले तरी एक असतात.या उलट आंबेडकरी चळवळीचे झाले आहे.ते विचाराने कितीही एक असले तरी ते कधीच एक नसतात, मग तो अन्याय,अत्याचार,हत्याकांडाची रमाबाई,खैरलांजी,सोनई,खडी,जवखेडा असो.ते वेगवेगळे लढणारच. मग सांगा यांना एक बाबासाहेब मान्य आहे काय?. त्याच बाबासाहेबांनी लिहलेली भारतीय राज्यघटना,संविधान यांना मान्य आहे काय?.जर हे मान्य नसेल तर कोणत्याही कुटुंबाची दुर्दशा होणारच मग ते प्रकाश असो की आनंद, उद्धव असो कि राज,तशी चळवळीची ही दुर्दशा होणारच कारण त्याला कोणतीही निमावली लागू नाही.

महापरिनिर्वाण दिन एकाच महापुरुषाचा देशात मानला जातो.देशात अनेक सम्राट,ह्र्दय सम्राट झाले.त्याचा स्मृर्तीदिन कधी आला आणि गेला तो कोणाला कळत सुद्धा नाही.पण डॉ.बाबसाहेब आंबेडकर असे महामानव आहेत त्याच्या स्मृतीदिनाची जगात दखल घेतल्या जाते. त्याच्या त्या महापरीनिर्वाण दिनाला काही लोक मोठ्या प्रमाणात गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत होते.त्यांना ते शक्य झाले नाही.पण २०२० पासून कोरोनाच्या लॉक डाऊन च्या नांवा खाली ते करून दाखविल्या जात आहे.शिवाजी पार्क आणि परिसरात खेळणे,कपडे विकणारे.वर्षभराचा धंदा या तीन दिवसात होत होता. मग दुकानदार कोण व खरीददार कोण?.कॅसेट सीडीची पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. गेल्या दोन वर्षात यावर बंदी आणण्यात आली.यावर चळवळीच्या नेत्याचे एकमत आहे काय?.काय करते महापरीनिर्वाण समन्यव समिती ?.चैत्यभूमी विकास समिती ?.हे काही करू शकणार नाही.कारण यांना संविधानच मान्य नाही.

त्यामुळे महापरीनिर्वाण दिनाला लगाम लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.त्याला एक नेता,एक संघटना,एक पक्ष जबाबदार नाही.त्याला जबाबदार आहे आंबेडकरी चळवळ आणि समाज जबाबदार आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीची दुर्दशा झाली असे म्हटल्यास लिहल्यास चुकीचे ठरणार नाही.चळवळीची दुर्दशा होण्यासाठी अनेक विचारांच्या संघटनांनी हातभार लावला असे म्हणणे चूक ठरणार नाही.इतर समाजाला महापरीनिर्वाण दिवसाचा खूप त्रास होत होतो,त्यांना एवढी गर्दी पाहून धडकी भरते ते माणस आहेत हेच काही लोकांना मान्य नाही त्याच्या अंगावरील कपड्याचा घाण वास येतो ते परिसारत घाण करतात.असे अनेक आरोप लावल्या जात होते. हेच आरोप लावणारे इतर समाजाच्या नऊ / दहा दिवस चालणाऱ्या धांगडधिंगाला मोठया उत्सवाने स्वीकारतात.त्याचा वाहतूक,ध्वनी प्रदूषण, त्याच्या कडून घाण होत नाही का?. त्याची तुलना महापरीनिर्वाण दिनाशी होत नाही. आंबेडकरी चळवळ संघटना पक्षा बाबत त्यांना विचारले तर जे सत्य सांगणार नाहीत माहित असून त्यांना या बाबत विचारणे म्हणजे आंबेडकरी चळवळीत असंतोष पसरविणे नाही काय ?.बाबसाहेबांच्या वेळी जिवाला जिव देणारे सहकारी आंबेडकरी चळवळीत होते अनेक समस्या वर अभ्यासपूर्ण माहिती घेवुन ते संघटना पक्ष चालवत होते.

आजचे कार्यकर्ते नेते वाट पाहतात कधी कुठे पुतळयाची विटंबना होते कुठे आमच्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते,कुठे अन्याय अत्याचार आणि हत्याकंड घडते आणि आम्ही मोर्च्या आंदोलन करून तोडपानी करतो त्याचे भांडवल करून आमच्या नांवाची पार्टी बनवितो.काही घडलेच नाही तर आम्ही गप्प बसणार नाही पुतल्याची स्वछता करून सुशोभीकरण करा.नाही तर आम्ही आमरण उपोषण करतो. या रेल्वे स्टेशनला हे नांव द्या नाही तर ते करतो अशी ही चळवळ बाबासाहेबाची होती काय?.महापरीनिर्वाण दिनी जन आंदोलन करून नेते बनायचे अनेकांनी स्वप्न पहिले.कोणी स्मारकाचा शिल्पकार झाला.कोणी प्रणेता झाला,कोणी हृद्य सम्राट झाला.असे शॉट कट नेत्या बनणाऱ्याकडे बाबासाहेबांचे कोणतेही क्रांतिकारी विचार,योजनाची माहिती नाही. केवळ भावनिक राजकारण करणारे खरेच आंबेडकरवादी असू शकतात काय?.याच्या घरी यांचे माय बाप मेले असते. तर त्यादिवसी यांनी असे आंदोलन केले असते काय?.याच दिवसी जेलभरो करून,सामुहिक आत्मदहन करणारे आंबेडकरी विचार आणि चळवळ पुढे नेणारे असू शकतात?.यांनी कोणी केली ही चळवळीची दुर्दशा?.माझ्या तमाम जागृत समाज बांधवा नो हिच वेळ आहे आपल्या बाबाच्या महापरीनिर्वाण दिनाच्या दिवशी आत्मचिंतन करण्याची आता किती वेळ सांगणार इतिहास वाचल्या वर इतिहास घडविता येतो. येणारी पीढी आपला पन्नास वर्षाचा इतिहास वाचेल.तेव्हा सांगा त्याना नामांतर साठी किती वर्ष लढ़लो आणि नामविस्तर करून समाधान पावलो.पुतला विटंबना झाल्या मुले रमाबाई हत्याकांड घडले.मनोहर कदम चे काय झाले.खैरलांजी,सोनाई,खर्डा,जवखेडा हत्याकंडाचा इतिहास लिहावा लागेल ते पुढील पिढी वाचेल नंतर बाबासाहेबाचा इतिहास वाचेल. कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?. राहील त्याचे घर नसेल त्याचे काय?. किमान वेतन लागू झाले काय?.

आठ तास दिवटी.असंघटीत कष्टकरी कामगार मजुरांची नांव नोंदणी.शिक्षण घेण्यासाठी असलेले वसतीगृह,सुशिक्षित बेरोजगारासाठी असलेल्या योजनाची अंमलबजावणी झाली काय?. शेतमजुरासाठी असलेली रोजगाराची रोजगार हमी कुठे आहे.आरोग्यासाठी सार्वजनिक हॉस्पिटल.ह्या मुलभूत अधिकारासाठी बाबासाहेबांनी किती अभ्यास करून संघर्ष केला.आजची चळवळ याबाबत काय करते हा इतिहास कसा लिहणार.भविष्यात युवापिढी विचारलेल सांगना बाबा तुमच्या चळवळीची दुर्दशा कशी झाली. येणाऱ्या काळात आपण काय करणार आहोत.आपली आपल्या समाजाच्या चळवळीची दिशा काय असेल.बाबासाहेबाना विनम्र अभिवादन करताना हा प्रश्न प्रत्येकानी स्वताला विचारवा हेच खरे विनम्र अभिवादन असेल.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९