संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने पैसे घेणाऱ्या दलाला पासून नागरिकांनी सावध रहावे-शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते

64

🔹दलालांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा गाठ शिवसेना सोबत आहे- गर्भित इशारा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.15जानेवारी):-संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने सध्या काही लोकांचा गोरखधंदा सुरु झाला असून निराधार व्यक्तिची केस बनविन्याच्या नावाखाली दलाल सक्रिय झाले असून नागरिकांनी सावध राहावे असे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना केले आहे,केंद्र व राज्य शासनाने विधवा,अपंग, वयोवृद्ध नागरिकांना मदत म्हणून तहसील कार्यालयांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून गरजवंताना एक हजार रुपये प्रति महीना मानधन दिल्या जाते.

प्रत्येक महिन्याच्या बैठकीमधे पात्र लाभार्थयाना संजय गांधी निराधार समितिच्या बैठकीत मंजूरी प्रदान करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे अध्यक्षते खाली सर्व सदस्य जास्तीत जास्त लाभार्थियांना लाभ करुण देण्याच्या प्रयत्न करीत असतात, परंतु योजनेच्या नावाखाली काही दलाल सक्रिय झाले असून या मधे खाजगी दलालासोबत महसूल विभागातील काही कोतवाल सुध्दा सामिल झाले आहेत, लाभ देण्याच्या नावा खाली केसेस बनविना करीता हजार ते दोन हजार रुपये घेतात व अपात्र असताना सुद्धा पात्र दाखविन्याचे प्रकार सरास पणे सुरु झाले आहेत, अशा दलालांपासून सावध राहण्याचे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना केले आहे, गरजु लाभार्थियाकड़ूंन अतिरिक्त पैसे उकळन्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना पध्दतीने समज देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला.