चंद्रपूर जिल्हय़ातील सर्व नवीन रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड चालु करुन लवकरात लवकर धान्य द्या

31

🔹अन्यथा आंदोलन करू सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर यांच्या इशारा

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.११आगस्ट):-रोजी मा. चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की नवीन रेशनकार्ड धारकांनी रेशनकार्ड काडुन तिन ते चार वर्षे ओलांडून गेली असुन तरी सुद्धा रेशनकार्ड धारकांना रास्त दुकानातून राशन मिळत नाही आहे.असा वेळेस गोर गरिब नागरिकांना अन्नधान्य मिळत नसल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला असून त्यांना राशन लवकरात लवकर देण्यात यावे.

अशी अट सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी धरली शासन अन्य पुरवठा योजनेतून करोडो रुपयांची योजना काडतात.परंतु ज्या नवीन नागरिकांनी रेशनकार्ड काडले त्यांना आतापर्यंत रेशन दुकानातून राशन मिळत नाही आहे.काही नागरीकांनी विचारले असता त्यांना सांगण्यात आले की तुमचा कोटा अद्याप यायचा आहे.पण तिन ते चार वर्षे ओलांडून जर चंद्रपूर जिल्हय़ातील नागरिकांना राशन मिळत नसेल तर रेशनकार्ड कशाला यांच्या विचार आम्ही करु असा प्रश्न जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी केला.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी यावेळेस सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांना निवेदन देते वेळेस आश्वासन दिले की लवकरात लवकर हे निवेदन आम्ही सर्व तहसीलदार व संबंधित अधिकार्‍यांना तातडीने पाठवुन चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व नवीन रेशनकार्ड धारकांना राशन मिळाले पाहिजे यांची आम्ही काळजी घेणार असे चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.निवेदन सादर करताना अशोक आसमपल्लिवार अशोक भगत जगदीश मारबते आशिष परेकर ललित गाताडे दत्ता वाघमारे राकेश पारशिवे सोनु फुलकर आदित्य सिंह ओम डोरलीकर कुणाल कामतवार अंकीत नालमवार सिद्धार्थ गुडदे आदी उपस्थित होते