साहित्यिक व कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

54

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.25ऑक्टोबर):-झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोलीच्या वतीने १जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया , चंद्रपूर या चार जिल्ह्यातील लेखक/कवींच्या उत्कृष्ट साहित्यास खालीलप्रमाणे पुरस्कार देण्याचे ठरले आहे. त्यासाठी कवी लेखकांनी आपल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती , डॉ. चंद्रकांत लेनगुरे, चामोर्शी रोड, साईनगर, गडचिरोली या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष दिनांक १५/११/२०२२ पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवाव्या. त्यानंतर आलेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केल्या जाणार नाही.

पहिल्या गटात झाडीबोलीतील उत्कृष्ट पुस्तकास १ पुरस्कार – (यात कथा, कविता, कादंबरी, वैचारिक सर्व साहित्य प्रकार समाविष्ट असेल.) यामधून फक्त एका पुस्तकाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल.तर दुसऱ्या गटात प्रमाण मराठी भाषेतील कविता संग्रहास एक आणि कवितासंग्रह व्यतिरिक्त इतर साहित्य प्रकारास एक असे दोन पुरस्कार देण्यात येईल. तर तिसऱ्या गटात लोक कलावंतांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

अशा कलावंतांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रमाणपत्रासह सादर करावा. या योजनेच्या अटी पुढीलप्रमाणे आहे . लेखक, कवी, लोक कलावंत हा झाडीपट्टीतीलच असावा. मंडळाने घेतलेला निर्णय बंधनकारक राहील. चारही पुरस्काराचे स्वरूप – एक हजार एक रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ आहेत.झाडीपट्टीतीलल लेखक , कवींनी पुरस्कारासाठी आपापले प्रकाशित ग्रंथ वेळेत पाठवावे ,असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे सचिव श्री कमलेश झाडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.