मुस्लिम समाजाचे देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं

29

एन आर सी आणि सी ए ए मूळे सर्वात जास्त मुस्लिम समाजाला टार्गेट केले गेले आणि देशातील नोट बंदी,भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी या मूळ समस्या कडून लक्ष दुसरीकडे वळविण्यात मोदी सरकार यशस्वी झाले.पण हे सांगितल्या गेले नाही की या बिलाची कायद्याच्या चौकटीत अंमलबजावणी सुरू झाली तर सर्वात जास्त मागासवर्गीय जाती,जमाती,भटक्या,विमुक्तया, आदिवासी आणि अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम समाजातील लोक एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक म्हणून नांव नोंदणी केली जाणार नाही. कारण मूळ कागदपत्रे सादर करण्यात हे सर्व घटक अपयशी ठरले जातील.परंतु हे घुसखोर नाहीत तर हजारो वर्षांपासून या देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं जोडलेल लोक आहेत.

आसाम मध्ये नागरिकता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा त्यात आसाम मध्ये राहणारे अडीच लाख आदिवासी आपले पुरावे देवू न शकल्यामुळे आज सरकारी बंदी म्हणून जेल मध्ये आहेत. कारण ते 1947 च्या आधीचे व 1971 पर्यंतचे पुरावे देवू न शकल्याने त्यांना भारतीय नाहीत म्हणून सांगितले गेले. आपल्या कडे जर नागरिकता कायदा आला तर आपण कुठून कागद देणार?.लोक आपल्याला सांगतात की आधारकार्ड, मतदान कार्ड व रेशनकार्ड,जातीचे दाखले हे पुरावे आहेत. पण मतदान कार्ड 1995 ला आले, आधारकार्ड 2008 आले व रेशनकार्ड हे रहिवासी पुरावा मानला जात नाही ह्या NRC व CAA मधे सर्वांचे 1971 च्या आधीचे आजोबा किंवा वडिलांचा जन्म दाखला किंवा जमीनीचा सात बारा हेच पुरावा मानला जाईल. हे मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक समाजाकडे तर अजिबात नाही. म्हणून आपणास ह्या कायद्याला केवळ मुस्लिम समाजातील लोक विरोध करतात.तेच भारतातील बहुसंख्य हिंदूंचे शत्रू आहेत असे भाषविल्या गेले.त्यामुळेच विशिष्ट समाजाचे तीन टक्के लोक म्हणजेच मान्यताप्राप्त पत्रकार,संपादक,विचारवंत,साहित्यिक वृत्तवाहिन्याचे निवेदक सूत्रसंचालक मुस्लीम समाजा कडून मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण करतात.

दुसरीकडे अनेक राज्यातील आदिवासीचा सुप्रीम कोर्टात असलेला वन हक्क कायद्या बाबत ही सूनवाई सारखी टाळली जात आहे. केंद्र सरकार संविधानाच्या चौकटीत काम करतांना दिसत नाही.तर मनुस्मृतीची अंमलबजावणी करतांना दिसत आहे.आर्य भटा ब्राह्मणांनी या देशातील मातीशी व विचारांशी वेळोवेळी बेईमानी करून सौदेबाजी केली आहे. राज्यकर्त्यांना बायका,पोरी देऊन कट कारस्थाने करून प्रत्येक वेळी दगाबाजी केल्याचा इतिहास आहे.भारतातील थोर मुस्लिम पराक्रमी योद्धे महापुरुषांना साथ देणारे नेहमी प्रकाश झोतापासून अलिप्त राहुन देशसेवा करणारे मुस्लिम इतिहासाच्या पांनापानांवर दिसणारे आहेत.सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे हजरत.टीपू सुलतान व बंगालचे नवाब सिराजुदौला मुस्लिम समाजातील होते. 1857 च्या उठावामध्ये दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व त्यांचे असंख्य अनुयायी मुस्लिम समाजातील होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजल खानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे रुस्तुमे जमाल हनेनान मुस्लिम होता.

अफजल खानाचा कोथला काढला हे नेहमी सांगितले जाते, पण शिवाजी महाराजांच्या मानेवर तलवार चालविणारा भास्कर कुलकर्णी सांगितल्या जात नाही.वैचारिक निष्ठा आणि पैशासाठी नोकरी करणारे यातील फरक कळला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते ते केवळ पैसा साठी चाकरी करीत नव्हते.त्यात स्वराज्य निष्ठा आणि वैचारिक बांधीलकी होती.शिवाजी महाराजांचे एकमेव वकील काझी हैदर मुस्लिम होता.हा इतिहास सोयीस्करपणे टाळला जातो.

महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे मुन्शी गफ्फार शेख, महात्मा फुलेना घर व शाळेसाठी जागा देणारे उस्मान शेख,राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका फातिमा शेख कोण?. उस्मान शेखची बहीण,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जगप्रसिद्ध चवदार तळे आंदोलनाला आपली जागा देणारे फतेह खान, महात्मा गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे खान अब्दुल गफार खान.शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे नसीम चंगेजी. बाबासाहेबांना घटनासमिती वर जाता यावे म्हणून तेव्हाच्या प. बंगालच्या आता बांग्लादेश, च्या मुस्लिमांनी बाबासाहेबांना निवडून आणले म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले.हा इतिहास मागासवर्गीय,आदिवासी अल्पसंख्याक समाज विसरला असेल पण ब्राह्मण समाज विसरायला तयार नाही.

म्हणूनच तो प्रत्येक वेळी वेगवेगळे कट कारस्थाने करून सर्व मागासवर्गीय,आदिवासीयांना हिंदू म्हणून एकत्र करतो आणि मुस्लिम समाजा विरोधात दंगली घडविण्याचे नियोजन करतो.हा खरा इतिहास सर्वाना मागासवर्गीय,आदिवासी, अल्पसंख्याक समाजातील जागरूक नागरिकांनी,कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वाचला पाहिजे. आप आपल्या समाजात प्रबोधन शिबीर घेऊन जनजागृती केली पाहिजे.
भारतीय मुस्लिम बांधवानी कोणत्याही राजकीय पक्षात जातांना आर्थिक स्वार्थ, व्यक्तिगत पदाची लालसा दूर ठेवून देशहितासाठी समाजहितासाठी वैचारिक दृष्टीने जागरूक राहिले पाहिजे. ब्राह्मणांच्या पोरी बायका मिळतात म्हणून समाजद्रोही होऊ नये. किती ब्राह्मणांच्या पोरी,एस सी,एसटी व मुस्लिमांच्या घरात आहेत हे सांगण्यासाठी हा लेख नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभा मध्ये कोणी निवडून पाठविले. ते बंगालचे 48% मुस्लीम समजाचे लोक होते.तोच प्रदेश आज बांगलादेशात का गेला?. इतिहास वाचा मुस्लीम देशाच्या मातीशी प्रामाणिक आहेत. एक दोन माथेफेरू चुकीचे वागतात म्हणूनच सर्व समाज नालायक बदमाश ठरविला जात आहे. तोच कायदा राष्ट्रपिता महात्मा गांधीला गोळ्या मारणाऱ्या नथुराम गोडसेला का लावला जात नाही?. सकाळी उठल्यावर राम नाम सत्य है का म्हटल्या जात नाही?.

देशाचे दुश्मन मुसलमान नाहीत तर राज्यकर्ते आहेत. ज्यांच्या मतदानाने हे निवडून आले तेच मतदार त्याचे मतदार यादीतील नांव आणि निवडणूक ओळख पत्र भारताचे नागरिक होण्यास पात्र नाही ?. मग प्रथम सर्व मतदार याद्यातील नांवे रद्ध करा जे एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक आहेत त्यांच्या कडून लोकसभेच्या प्रतिनिधीची निवड करा. भारतात असे भासविले जाते कि मुसलमान देशाचे दुश्मन आहेत.असे असते तर अकबर बादशहा चा सेनापति मानसिंह एक हिन्दू नसता. आणि महाराणा प्रताप सिंग यांचा सेनापति हकीम खां एक मुसलमान नसता.

जेव्हा जेव्हा यांचे कट कारस्थान उघड होते तेव्हा तेव्हा यांना धोका निर्माण होतो.त्यावेळीच हे सांगतात देश खतरा मै है. देश खातरयत कधीच नसतो असे तर यांनी सत्ता आणि कुर्सी त्यासाठीच देशात सर्वात संवेदशील समाज म्हणून हिंदू म्हणजे ८५ टक्के मागासवर्गीय,आदिवाशी आणि मुस्लीम समाजात भावनिकदृष्ट्या दंगली लावल्या जातात मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक यांना सरकार मुलभूत अधिकार देण्यास असमर्थ ठरते तेव्हाच सर्व देशाच्या नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असे मनुस्मृती प्रणित कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे.त्यासाठी हिंदू असो या मुस्लीम यांनी देशाच्या मातीशी वैचारिकता दाखवून शांत राहून भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय मागितला पाहिजे.भारताचे जागृत नागरिक म्हणून आपण जागे राहिलो नाही तर भयंकर परिणाम सर्व देशवासीयांना भोगावे लागतील.

आजचे आर एस एस प्रणित मोदी सरकार हिंदू मुस्लीम समाजा समोर जेवणाची पंचपक्वान असलेली थाळी ठेवून आहे. पण तुमचे हात व तोंड बांधून ठेवत आहे.ज्यांना तुम्ही मतदार म्हणून निवडून दिले तेच तुम्हाला भारताचे नागरिक असण्याचे सिद्ध करण्यास सांगत आहेत. हिंदू मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना वाटते एन आर सी फक्त मुस्लीम समाजासाठी आणि अल्पसंख्याक मुस्लीम समाज हि हेच लक्षात घेऊन जास्त आक्रमक होऊन जन आंदोलने करीत आहे. साहजिकच इतर समाज मुस्लिमांच्या या एकजूटीचा हेवा करीत आहे.बहुसंख्य मागासवर्गीय हिंदू अशिक्षित,अज्ञानी, अंधश्रद्धा मानणारे आहेत त्यांना मुस्लीम समाज कसा संघटीत आणि आक्रमक आहे हे सांगितल्या जाते. पण त्यांची पाळेमुळे या देशाच्या मातीत तेवढीच घट्ट व वैचारिक दुष्ट्या मजबूत आहेत हा इतिहास सांगितला जात नाही.भारतीय संविधान जर संपले ते या देशात कोणीच सुख समाधानाने जगू शकणार नाही. जे स्वताला हिंदू समजतात ते सर्व मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मनुस्मुर्ती नुसार वागविले तर काय होईल?. आर एस एस प्रणित संस्था,संघटना बुद्धीजीवी पत्रकार,संपादक लोकप्रतिनिधी रात्रन दिवस संविधान नष्ट करण्यासाठी काम करीत आहेत.एकदा संविधान संपल कि या देशातील बहुसंख्य हिंदू मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहणार नाही.मुस्लीम या देशाचे मोठे दुश्मन आहेत,हे प्रथम सर्वांनी डोक्यातून कडून टाकले पाहिजे.मुस्लिम समाजाचे भारताशी वैचारिक नाते ?. हा इतिहास आहे हे विसरू नका.जात ,धर्म प्रांत, हे विसरून भारतीय नागरिक म्हणून संघटीत झाले पाहिजे.नंतर विचार करण्यासही वेळ मिळणार नाही.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९