🔸महिला जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके यांचे नेतृत्व
✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.15मे):-शहरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुलतानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मूक्तीचं,अछे दिन च स्वप्न दाखवल. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल,स्पयंपाकचा गॅस अश्या सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.