✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)
अमरावती(दि.30ऑक्टोबर):-मंत्रालय मुंबई या ठिकाणी युवा नेते कुणाल भाऊ ढेपे यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा जलना जिल्हा पालकमंत्री मा.राजेश टोपे यांची भेट घेऊन आरोग्य विभागातील भरतीचा झालेला गोंधळ लवकरात लवकर दूर करावा व योग्य त्या पद्धतीने मुलांना पेपर कसे देता येईल यावर उपाययोजना कराव्यात तसेच भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली.
त्याचप्रकारे ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या विकासात्मक योजना राबविण्यात येणे गराजचेचे आहे. नवीन विकासात्मक योजना ग्रामीण भागात लवकरात लवकर पोहचत नाहीत त्या साठी उपाय योजना करव्या अशी मागणी युवा नेते कुणाल भाऊ ढेपे यांनी केली.