शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम

33

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.18ऑक्टोबर):-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवली.केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी विरोधी तीन काळे यांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे.

जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. सविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसवून कोणतेही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर हे तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, संघर्ष हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नवीन शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी. याकरीता हुकुमशाही केंद्र सरकार विरोधात गडचिरोली जिल्हा भर शेतकरी बचाव तसेच शेतकरी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

यावेळी गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटी गडचिरोली व गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी धानोरा, मुरूमगाव, सावरगाव, कोटगुल, कोरची, कुरखेडा दौरा करून विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्थानिक समस्या, विविध बांधकामांची पाहणी व तेथील स्थानिक नागरिक, तालुका अध्यक्ष, आजी माजी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर यांना हे तीन काळे कायदे विषयी माहिती सांगून ते तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी अशी माहिती दिले.

त्यानंतर कॉंग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती सांगून प्रत्येक बूथ स्थरावर शेतकरी विरोधी विधेयक विरोधात शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यावी असे यावेळी डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी गडचिरोली यांनी सांगितले.

यावेळी दौरा केला असता, जिल्हा परिषद सदस्य श्री विनोद लेनगुरे, माजी सदस्य पंचायत समिती श्री. परसराम जी पदा, संजय गावडे, सदुकर हलामी, कौशिक धूर्वे उपस्थित होते.