चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 222 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह

72

🔺गेल्या 11 दिवसांपासूनची कोरोना मृत्यू श्रृंखला तुटल्याने काही प्रमाणात दिलासा

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.19नोव्हेंबर):-जिल्ह्यात 253 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच मागील 24 तासात एकही कोरोनाबाधीताचा मृत्यू न झाल्याने गत 11 दिवसांपासूनची कोरोनामृत्यू श्रृंखला तुटल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र 222 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 173 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 736 झाली आहे. सध्या 2 हजार 160 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 33 हजार 718 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 13 हजार 315 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 277 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 257, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.