कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने मिरेवाड यांचा सत्कार

29

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.27डिसेंबर):-नायगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या नुकताच “माती शाबूत राहावी म्हणून..” या काव्यसंग्रहाला पद्मगंधा फाउंडेशनचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे .यापूर्वी मिरेवाड यांना अकोल्याच्या संकेत प्रकाशनचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि कवितासंग्रहाची विशेष गौरव म्हणून भि.ग. रोहमारे कोपरगाव या संस्थेनेही नोंद केली आहे.

त्यांच्या या साहित्यिक चळवळीला बळ देण्यासाठी कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी नांदेड जिल्हा कोळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष माधवराव रेडेवाड, दिलीप जेठेवाड,अशोक जेठेवाड, कृष्णा खानापूरकर , उपक्रमशील शिक्षिका द्वारकाताई मेघमाळे आणि हणमंत वानोळे उपस्थित होते.