हिंदूंचा शत्रु मोदी आहे आणि आरएसएस भारताचा विध्वंसक !

26

मुसलमानांना हिंदूचे शत्रू सांंगून बहुमत मिळवणारे मोदी हिंदूंचे तारणहार नाहीत तर हिंदूंचे शत्रू आहेत. मनमोहनसिंग सरकारच्या काळात आलेल्या जागतिक आर्थिक मंदीने जगातल्या बड्याबड्या आर्थिक महासत्तांची कंबर मोडली , तेव्हा मनमोहन सिंह यांनी दिवाळखोरीपासून भारताला वाचविले परंतु आपली सत्ता नाही वाचवू शकले.

जागतिक आर्थिक मंदीमुळे भारतातील मध्यमवर्गाच्या नफ्याला मोठा धक्का बसला. बेरोजगारी वाढली आणि मध्यमवर्गाची लालसा शिगेला पोहोचली. ज्या देशाने फक्त कंगाली पाहिली होती त्यांची मनमोहन सरकारच्या काळात पाचही बोटे तुपात होती. परंतु “दिल मांगे मोर” या मध्यमवर्गीय तृष्णेला मनमोहन सिंंह शांत करू शकले नाहीत आणि ते विकासाच्या जुगाडाचे बळी ठरले

देशात मनमोहन सिंह सरकारला, भ्रष्टाचाराचा अत्यंत काळा अध्याय सिद्ध करण्यासाठी आरएसएसने भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या एका माजी अधिकाऱ्याकडे या षडयंत्रांची सूत्रे सोपविली. आरएसएस ने संविधानिक संस्थानांना पोखरले आणि कॅगच्या माध्यमातून मनमोहन सरकारवर काळीमा फासला. नफेखोर मीडियाने खोटा गांधी उभा केला.जन्मजात कॉंग्रेसच्या विरोधात जळफटणारे भारताचे बुद्धिजीवी, जनहितामध्ये गुंतलेले सामाजिक कार्यकर्ते, सुप्रसिद्ध वकिल हे आरएसएस पुरस्कृत तथाकथित भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे बळी पडले. मनमोहन सरकारची प्रतिमा मलिन झाली आणि
आरएसएसचा कट यशस्वी झाला.

आरएसएसने मध्यमवर्गाच्या लालसेला विकासाचे आमिष दाखवून, आपलेसे केले. मोदींना विकास पुरुषाचा अवतार सिद्ध करून नफेखोर मीडियाच्या बळावर गुजरातला विकासाचे मॉडेल सिद्ध केले. मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले. पाकिस्तानचा तडका लावून मोदी भारतीय मानसला हिंदू-मुस्लिम मध्ये विभाजित करण्यात यशस्वी झाले. गर्वाने हिंदू बनलेल्या मेंढरांनी देशात पहिल्यांदाच आरएसएसची बहुमताची हिंदू सरकार स्थापन केली !

आरएसएस सरकारने नोटबंदी करून हिंदू कामगार, गरीब मुस्लिम, लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांची कंबर मोडली. काळा पैसा संपवण्याच्या नावाखाली भारतीय अर्थव्यवस्थाच उध्वस्त केली. नोटबंदी सामान्य हिंदूना संपवण्याचा डाव होता. हा विद्रोह दाबण्यासाठी मोदींनी राष्ट्रवादााचा तडका लावला आणि सैनिकांच्या हौतात्म्यावर पुन्हा बहुमत मिळवले. देश विदेशातील भारतीय लोकांना आपल्या निवडणुकीच्या आगीत भस्मसात केले. डंका पिटला कि, भारतीय पासपोर्टचा आज जग सन्मान करत आहे. याउलट ट्रम्पने हजारो भारतीयांचे वर्किंग व्हिसा रद्द केले. परंतु मेंढरे मंगल गीत गात राहिली .

न्यायव्यवस्थेला पायदळी तुडवून भारताच्या पंथ निरपक्षतेला भगवा रंग दिला . राम मंदिर निर्माणाची घोषणा करून भुकेल्या, बेरोजगार हिंदूंचा रोष दाबला. मेंढ्यांनी ‘येणार तर मोदीच’ असा नारा दिला. व्यक्तिगत आस्थेला राष्ट्राची अस्मिता बनविण्याचे दुष्कर्म करून आरएसएस ने ‘भारत एक विचार’ याचे मूळ उखडले. अहंकारात बुडालेली सरकार व्यक्तीवादाचा बळी ठरली. संपूर्ण प्रशासन कोलमडले. कोरोनाने हाहाकार झाला. चहूबाजूला मृत्यूचे तांडव, स्मशानभूमीत जागा कमी पडत आहेत, कब्रस्तानात मृतदेह पसरलेले आहेत.एकेका श्वासासाठी जनता जीवाचं रान करत आहे आणि विकारी मोदी सरकार इस्पितळात बेड, औषध किंवा ऑक्सिजन पुरवू शकत नाही.

हिंदूंच्या अंतःकरणात मुस्लिमांविरूद्ध द्वेषाची आग पेटवून मोदींना सत्ता तर मिळाली, पण ती आग हिंदूंची चिता बनली. त्याच आगीच्या चितेत आज हिंदू जळत आहेत. हिंदू आणि मुस्लिम दोघेही मरत आहेत. विदेशात भारताची छी थू होत आहे.

आरएसएस हा भारताचा विध्वंसक आहे. प्रेम, विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृती आहे आणि वैश्विक ओळख आहे. विकारी संघाने याच संस्कृतीला नष्ट करण्यासाठी जनतेत एकाधिकारवाद, हिंदू बहुलवाद आणि वर्चस्ववादाचे विष भरले. परदेशी वृत्तपत्रे देशाची दुर्दशा आणि मोदींच्या दुष्कर्मांनी भरलेले आहेत.

जगाने हे मान्य केले आहे की ‘भारतीय जनता नाही तर सांस्कृतिक वारसा मरत आहे.’मृत संस्कृतीच्या सिंहासनावर विकारी शासक बसलेला आहे ! हिंदूंचा शत्रू मोदी आणि भारताचा विध्वंस करणाऱ्या आरएसएस चे कारनामे जगाला माहिती झाले आहेत!मेंढऱ्यांनो हा भारतीय पासपोर्टचा सन्मान नाही तर देहावसन आहे .

✒️लेखक:-मंजुल भारद्वाज(संपर्क क्र. 9653437014)
( लेखक वैश्विक रंगचिंतक आणि तत्वज्ञ आहेत )