खटावचे जवान अजिंक्य राऊत यांना वीरमरण

30

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)

सातारा(दि.29ऑगस्ट):-जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव येथील जवान अजिंक्य किसन राऊत यांना सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबासह खटाव तालुक्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे आई, वडील ,पत्नी एक भाऊ ,असा परिवार आहे. अजिंक्य 2014 मध्ये भरती झाले. या काळात त्यांनी विविध ठिकाणी काम केले सध्या सिकंदराबाद येथील आर्मी मेडिकल कोर येथे कार्यरत असताना अचानक त्याची प्रकृती खालावली. त्यांच्यावर उपचार करत असताना त्यांना वीरमरण आले.

असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले त्यांचे शिक्षण खटाव येथील लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल खटाव. उच्च माध्यमिक शिक्षण शहाजीराजे महाविद्यालय खटाव. येथे झाले होते मनमिळावू आणि सामाजिक कार्यकर्ते ते म्हणून त्यांची ख्याती होती. अंबाबाई क्रीडा मंडळाचे ते सदस्य होते. सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेत असत. त्यांचा मोठा मित्रपरिवार असून खटाव मध्ये त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले.