वंचितच्या रणरागिनी कडून तृतीय पंथीयांना मद्दत

30

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुबंई(दि.२७सप्टेंबर):- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी  तृतीय पंथी यांना वंचित बहुजन आघाडी नालासोपारा पुर्व ऑफिस मधून राशन वाटप करण्यात असून ४० जणांना आज राशन वाटप झालं आहे.

प्रमुख उपस्थित वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आणि रेणुका सचिन जाधव वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते , दुर्गा कांबळे, राजेश्वरी गुप्ता , निशा गुप्ता, गुडिया सोनी, माया प्रसाद , संध्या दुबे, संगीता प्रसाद,आकाश गायकवाड , गौतम कांबळे, प्रतीक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते वरील कार्यक्रम खाना चाहिए फाउंडेशन चे मंगेश सर आणि पारस सर यांच्या विद्यमाने तृतीय पंथीयांना रेणुका सचिन जाधव यांनी धान्य वाटप केले .