गेवराईतील चहावाल्या आब्बासने घातला अनेकांना लाखोंचा गंडा

49

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.19डिसेंबर):-शहरातील संजय नगर भागात रहिवासी असलेला तसेच गेवराई न्यायलयाच्या आवारात चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अब्बास शेख नामक व्यक्तीने शहरातील अनेक नागरिकांना लाखो रूपयांचा गंडा घालत धूम ठोकली आहे. त्याच्या या कारनाम्याने शहरात खळबळ उडाली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चाळीस वर्षापासून संजयनगर भागात रहिवासी असलेल्या आब्बास शेख यांचा गेल्या अनेक वर्षापासून न्यायालय परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय होता. त्यातून त्याला चांगले उत्पन्नही मिळायचे. मात्र लॉकडाऊननंतर त्याचा व्यवसाय अडचणीत आला. त्यामुळे त्याने नामी शक्कल लढवत अनेकांकडून हातउसने पैसे घेतले. त्याचबरोबर त्याने घर दुकान, शेती यावरही लाखो रूपयांचे कर्ज काढले होते. या कर्जाचे व्याज आणि इतर लोकांची देणी परतफेड करणे शक्य न झाल्याने तो पसार झाल्याची चर्चा रंगली आहे.

संजयनगरमधील एका महिलेच्या नावावर तसेच इतर लोकांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून फायनान्स आणि बँकांतूनही पैसे उचचल्याची माहिती आहे. तसेच आपल्या हॉटेल व घराची कायदेशीर नोटरी विविध लोकांना करून देत त्यांची फसवणूक केली आहे.ज्यांची फसवणूक झालीय ते आब्बासचा कारनामा ऐकून चकित झाले आहेत. तर तो सध्या कुठे आहे याचा मागमूसही अद्याप लागलेला नाही. फसवणूक झालेल्यांपैकी कोणीही पोलीसांत तक्रार देण्यासाठी अद्याप पुढे आलेले नाही.