बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

30

🔹31 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16फेब्रुवारी):- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उप प्रकल्प राबविणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज हे शेतमाल, शेळया (मांस व दुध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उप प्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभागसंघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्राचा समावेश आहे.

जाहिराती संदर्भातील संपुर्ण माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिन्ट घ्यावी, त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी, यांचे कार्यालयमार्फत प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, चंद्रपूर येथे तसेच लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एम.एस.आर.एल.एम यांचे कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने दि. 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही. असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणेचे (आत्मा), प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.