एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल; युक्रेनमधील २५० विद्यार्थी दिल्लीत पोहोचले

27

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.27फफेब्रुवारी):-चार दिवसापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारतील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.आनंदाची बातमी म्हणजे आज सकाळी २५० विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने हे २५० विद्यार्थी भारतात आणले आहेत.’ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते.

त्यानंतर आज २५० विद्यार्थी भारतात परतले आहेत. गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.
रशियाकडून सतत होणाऱ्या हल्यामुळे युक्रेमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, युक्रेनवर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक विद्यार्थी बंकरमध्ये राहत आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. सरकारने आम्हाला वेळेवर बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद, अशा प्रतिक्रिया युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहे