विजयसिंह पंडित यांच्यामुळे माटेगावकरांचा विजेचा प्रश्‍न लागला मार्गी

93

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.2एप्रिल):-माटेगाव येथे अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्‍न गंभीर बनला होता. ग्रामस्थांनी माजी आ.अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याकडे विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी डीपी बसविण्याची मागणी केली होती. विजयसिंह पंडित यांनी महावितरणशी संपर्क साधून माटेगव येथे डीपी चा प्रश्‍न मार्गी लावला आहे. दरम्यान माटेगाव येथे महावितरणकडून नुकतीच डीपी बसविण्यात आली असून ग्रामस्थांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

माटेगाव येथे कदमवस्ती, चव्हाणवस्ती आणि खनाळवस्ती येथील नागरीकांशी गेल्या अनेक दिवसांपासूनची विजेची मागणी होती यासंदर्भात ग्रामस्थांनी माजी आ.अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान या मागणीची दखल घेवून महावितरणने माटेगाव येथे नुकतीच डीपी बसवली असून यामुळे माटेगाव आणि परिसराचा विजेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. यावेळी गिताराम शिंदे, जिजा चव्हाण, योगीराज चव्हाण, रामदास चव्हाण, राजेंद्र हुंबे, शेख मिनहाज, परमेश्‍वर कर्डिले, अनिरुध्द चव्हाण, गौरव चव्हाण, राजेंद्र कवठेकर, अशोक कदम, धर्मराज आरबड, बाबु खनाळ, राहुल गायके, गजानन गायके, परमेश्‍वर टेकाळे, गणेश कदम, सुधाकर चव्हाण, संभाजी आंतरकर, कैलास आटपळे, अविनाश शिंदे, सुभाष इगवे, अमोल गावडे, दत्ता कदम, बबन आटपळे, जनार्धन पाटोळे आदी उपस्थित होते.