बौध्द धम्म हा लोककल्याणकारी धम्म आहे – प्रा.मोहनराव मोरे

30

[विश्वशांती बौध्द विहार हरदडा येथे बौध्द मुर्तीची प्रतिस्थापना पार पडली..!]

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.5मे):-बौध्द धम्म हा लोककल्याणकारी धम्म आहे.समतेचा आणि ममतेचा मार्ग दाखविणारा हा धम्म ज्या ज्या देषांनी अंगीकारला ते ते सर्व राष्ट्र आज प्रगतीपथावर आहेत.

जगातील 157 देषामध्ये हा धम्म पोहचला असून भारत देषात बौध्दा धम्माचे अनुयायी वेगवेगळया प्रांतात विखुरलेला आहे.हा धम्म समुद्रांची अथांग खोली असलेला धम्म आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला दोन राश्ट्रीय ग्रंथ दिले पहिला आहे “बुध्दा ॲन्ड हिज धम्म” आणि दुसरा राश्ट्रीय ग्रंथ आहे ते म्हणजे भारतीय संविधान सर्वांना सुखी करणारा हा धम्म असल्यामुळे अनेक जाती धर्माचे लोक हा धर्म स्विकारण्यासाठी पुढे येत आहे असे प्रतिपादन प्रा.मोहनराव मोरे यांनी केले. ते हरदडा ता.उमरखेड येथील आयोजीत तथागत भगवान बुध्दांच्या मुर्तीच्या अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, डॉ.विजय माने, ॲड.परमेष्वर गोणारे, श्री.विनोद बरडे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उमरखेडचे अध्यक्ष संतोषभाऊ जोगदंडे, प्रा.दिपक वाघमारे, माजी. जि. प.सदस्य रामराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचे महत्व विदित केले.

विजयराव खडसे म्हणाले की, तथागत गौतम बुध्द हे क्षेत्रीय कुळांचे होते त्यांचा धम्म आम्हाला दिला खरे,खरे तर हा धर्म सर्वच लोकांचा आहे.केवळ कोणत्याही एका समुदायासाठी तथागताचे तत्वज्ञान नाही.सम्राट अषोकामुळे बौध्द धम्माला राजाश्रय मिळाला.

हा धम्म सर्व ठिकाणी पोहचविल्याचे सांगीतले यावेळी,विचार पिठावर ढाणकी षहर अध्यक्ष अमोल तुपेकर, पोलीस पाटील विडूळ गजानन मुलंगे,राश्ट्रवादी युवक कॉंग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष आदित्य पाटील काळे, सा. मा.संतोश काळे धानोरा, विश्व हिंदु परीशद कार्यकर्ता रविंद्र देषमुख,सरपंच हरदडा वैषाली विलासराव पायगन ,उपसरपंच विनोद विठ्टल गुड्डलवाड,ग्रा.प.सदस्य जनाबाई लांडगेवाड,ग्रा.पं.सदस्या लाता दत्ता पिलेवाड,ग्रा.पं.सदस्या सुनिता प्रषांत दवणे,ग्रा.पं.सदस्या प्रतिभा प्रवेष कवडे,श्रीरंग पायगन तं.मु.अ,सुप्रीया दवणे पो. पा. हरदडा, माधव नाना पिलवंड ख. वि.स. कल्याण पायगण सोसायटी अध्यक्ष, सतिश पायगण शिवसेना ता. संघटक,षिवाजी वानखेडे माजी. उपसरपंच हरदडा,देवीदास गोपनवाड कोळी समाज जिल्हाध्यक्ष,दिगांपर पायगण ,इत्यादी मान्यवर विचार पिठावर विराजमान होते. स्वागताध्यक्ष गौतम कांबळे हैदराबाद कर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

प्रबोधनाच्या या कार्यक्रमानंतर भिमषाहीर आनंद किर्तने नांदेड व प्रबोधनी साठे नागपुर यांचा बुध्द भिम गितांचा जंगी मुकाबला झाला.

यावेळी रषीक श्रोते संगीताच्या तालावर भिमराया घे पुन्हा या लेकरांची वंदना या गीतावर युवकांनी ठेका धरला.कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी भारत कांबळे,संभाजी कांबळे, प्रवेष कवडे आवृत्ती दै.विदर्भ केसरी यवतमाळ संपादक, माजी सरपंच रविंद्र दवणे, सामाजिक कार्यकर्ता संभा कांबळे व सूत्रसंचालन प्रणिता कांबळे यांनी केले तर आभार विश्वजीत कवडे यांनी मानले.