नुकसानग्रस्त कुटुंबांना भाग्यश्रीताई आत्राम यांचा मायेचा आधार

34

🔹आर्थिक मदत व अन्नधान्य किट वाटप

✒️सिरोंचा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सिरोंचा(दि. 19 जून):- तालुक्यातील आदीमुत्तापूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट लक्ष्मीपुर येथील लस्मय्या मलय्या दुर्गम व हनुमंतु मलय्या दुर्गम या दोन सख्या भावांची घरे आगीमध्ये जळून खाक झाली. याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी आर्थिक मदत व अन्नधान्य किट वाटप करत त्या कुटुंबांना मायेचा आधार दिला.

13 जून रोजी दुर्गम कुटुंबांची घरे जळून खाक झाली होती.या आगीत जीवनावश्यक वस्तू व चैनीचे वस्तू जळून गेल्याने दुर्गम कुटुंबांवर खूप मोठं संकट कोसळला होता.याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाग्यश्रीताई आत्राम यांना दिली.लगेच ताईंनी क्षणाचाही वाट न बघता लक्ष्मीपूर गाठून दुर्गम कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून परिस्थिती जाणून घेतली.किरकोड मदत देऊन त्या कुटुंबांना आधार देता येणार नसल्याचे त्यांना कळलं.त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दोन्ही कुटुंबांना अत्यावश्यक असे जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य किट आणि आर्थिक मदत तात्काळ पोहोचणार अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

भाग्यश्रीताई आत्राम यांनी त्या दोन्ही कुटुंबांना पुरेल असे सर्व जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य किट आणि आर्थिक मदत देऊन कार्यकर्त्यांना लक्ष्मीपूर पाठविले.लगेच कार्यकर्त्यांनी त्या दोन्ही कुटुंबांना तात्काळ मदत पोहोचविली. अखेर त्या दोन्ही कुटुंबांना ताईंनी मायेचा आधार दिल्याने त्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.