इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी

194

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

धुळे(दि.19सप्टेंबर):-कालपासून बहुतेक सर्वानाच एक मेसेज येतोय. मलाही आलाय ! त्याचाच स्क्रीनशॉट सोबत आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी संदेश आहे असं म्हणत तारीख आणि वेळ त्यापुढे टाकलेली! असे मेसेज येत आहेत. आणि एक नव्हे तर कैक मेसेज असे एकाच मोबाईलवर संगणकावर किंवा इलेक्ट्रीक बाईकवर येत आहेत! या मेसेजमुळे पॅनिक होऊन जाऊ नका ! इतकेच आधी सांगतो. हि एक प्रकारची अशी सुविधा ऍक्टिव्हेट करण्याचे टेस्टिंग सुरु असून त्यामुळे भविष्यात तुम्ही कधी कुठं संकटात सापडला, अडचणीत आला.

अपघातात अडकला तर तुमच्या नम्बरवरून एक इमर्जन्सी मेसेज तयार होऊन तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्रांना पाठवला जाऊ शकतो. जेणेकरून त्यांना तुम्ही संकटात आहात हे कळून त्यांनी मग धावपळ करून तुम्हाला संकटातून बाहेर काढावे. यातलीच दुसरी एक सुविधा बहुतेक ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न सुरु असावा जो “इमर्जन्सी” नंबर म्हणून बाय डिफॉल्ट प्रत्येक फोनमध्ये एक नम्बर सेव्ह करण्याची सोय असते मात्र ती सोय ऍक्टिव्हेट फारशी कुणी केली नसणार ! तर ती सेवा आता ऍक्टिव्हेट होण्याचे चान्सेस असून त्यानंतर मग तुम्ही जो कोणता एक नम्बर “इमर्जन्सी” म्हणून सेव्ह कराल त्या नंबरला तुम्ही संकटात आहात हा निरोप दिला जाईल अथवा ऑटो मोड ऍक्टिव्हेशन भविष्यात झाल्यास थेट त्या नंबरला कॉल जाऊ शकतो तूर्त ok क्लिक करा आणि फोन रिस्टार्ट करा !

म्हणून कुठलाही ऑनलाईन व्यवहार करतांना पक्की खात्री केल्याशिवाय व्यवहार करु नका. आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.