बस जळीत प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद [हदगाव येथून अटक : तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी]

180

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 26 नोव्हेंबर) नांदेडवरून नागपूरकडे
जाणारी बस क्रमांक गोजेगावजवळ पैनगंगा नदी पुलाजवळ अडवून तोडफोड करण्यात आली नंतर बस जाळण्यात आली होती.
ही घटना २७ ऑक्टोबरला घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मराठवाड्यातील हदगाव येथून तीन आरोपींना अटक केली.
सदर घटनेमधील आकाश हुलकाने (२३), शिवराज कदम (२५) आणि चेतन राठोड (२५, तिघेही रा. हदगाव, जि. नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना तब्बल २८ दिवसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. २७ ऑक्टोबरला नांदेडवरून नागपूरकरिता निघालेली बस रात्री ११:०० वाजताच्या सुमारास तालुक्यातील गोजेगावजवळ पोहोचली. पैनगंगा पुलाजवळ बस आली असताना दुचाकीस्वारांनी दुचाकी आडवी लावून बस थांबविली.

नंतर पाठीमागून आलेल्या पाच ते सहा इसमांनी बसच्या काचा फोडल्या. टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत बस खाक झाली होती.
बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान
झाल्याची तक्रार बसचालक बी.डी. नाईकवाडे यांनी दिली होती.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, ४२७, ३४१, ३३६, आरडब्ल्यू ३ नुसारे गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला होता.
तपासात आरोपी हदगाव येथे आहे, अशी माहिती मिळाल्यावरून ठाणेदार शंकर पांचाळ, पीएसआय किशोर घोडेस्वार यांनी शुक्रवारी पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास हदगाव येथे जाऊन तीन आरोपींना अटक केली त्यांना न्यायालयाने न्यायालयीत कोठडी सुनावली आहे.