✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातारा(दि.24जानेवारी):-सेतू किंवा महा-ई-सेवा केंद्रातून ग्रामस्थांना मिळणाऱ्या शासकीय दाखल्यांचे दर नियमाप्रमाणेच नागरिकांकडून आकारण्याचे आवाहन खटावच्या तहसीलदार श्रीमती माने यांनी केले.
ग्रामीण भागातील जनतेला प्रत्येक वेळेस शासकीय दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागू नाही म्हणून त्यांची सोय होईल या हेतूने शासनाने महा-ई-सेवा केंद्र मार्फत शासकीय दाखले मिळण्याच्या सोय उपलब्ध केलेल्या आहेत परंतु त्याचा काही ठिकाणी गैरफायदा घेतला जात असल्याची नागरिकांची तक्रार असल्यामुळे शासकीय दरपत्रक माही सेवा केंद्र च्या दर्शनी भागात लावण्याचे आव्हान खटावच्या तहसीलदार श्रीमती माने यांनी केली आहे.