देवपिंपरी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

35

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.6सप्टेंबर):-तालुक्यातील देवपिंपरी येथे एका ५५ वर्षीय शेतकऱ्यांनी राहत्या घरी रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवपिंपरी येथे सोमवारी रात्री घडली. घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी जमादार सादेक सिद्दिकी व पो. नायक व्हरकटे यांनी उपजिल्हा रूग्णालय गेवराई येथे दाखल केले.

बबन बाबूराव शेंबडे (वय ५५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बबन शेंबडे हे मूळ गेवराई तालुक्यातील देवपिंपरी गावातील रहिवासी असून, त्यांचा शेळी व्यापार हा व्यवसाय होता. परंतु त्यांच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून अकस्मत मृत्यू नोंद करण्याची प्रतिक्रिया सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले