नाशिकहून मुबंई व दिल्ली जाणारी राजधानी एक्सप्रेस आता रोज धावणार – खा. डॉ. भारती पवार

91

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.15जानेवारी):- जिल्ह्यातील यात्रेकरूंची मुंबई व दिल्लीला जाणारी मध्य रेल्वे ची राजधानी एक्सप्रेस ही रोज सुरू व्हावी म्हणून अनेक दिवसांची त्यांची मागणी होती .पहिल्यांदा राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोनच वेळेस नासिक हुन धावत होती .परंतु खा. डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नातून चार दिवस धावण्यास परवानगी मिळाली होती.

 तरीही ही एक्सप्रेस आठवडाभर रोज धावावी म्हणून मागणी होती तेव्हा खा .डॉ. भारती पवारांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचेकडे सातत्याने मागणी केली होतीआणि ह्या प्रयत्नाला यश मिळाले असून आता नासिकवरून मुंबई व दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस आता 19 जानेवारी पासून रोज धावणार आहे त्यामुळे अनेक दिवसांची यात्रेकरूंची मागणी आता पूर्ण झाली असल्याचे खा डॉ भारती पवार यांनी सांगितले व ही रेल्वे रोज सुरू केल्या बद्दल यांचे आभार मानले