पावसाळ्यात शिवणपायली येथील नागरिकांचा घसा कोरडा

27

🔺15 दिवसापासून नळाला पाणी नाही – पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण भटकंती

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.17जुलै):-चिमूर तालुकातील नेरीवरून जवळ असलेल्या सिरपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत शिवणपायली येथील गावकऱ्यांचे ऐन पावसाळ्यात नळाला पाणी नसल्यामुळे मागील 15 दिवसापासून घसे कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे ग्रा प कार्यालयात याबाबत माहिती देऊन नलयोजना पूर्वरत सुरू करून पाणी उपलब्ध करून दयावा अशी मागणी शिवणपायली येथील नागरिकांना केली आहे.शिवणपायली येथे पाण्याच्या टंचाई मुळे सन 2011 -12 ला पाण्याची टाकी आणि नलयोजना मंजूर होऊन बांधकामाला सुरवात झाली आणि2015 पूर्ण झाली सन2015 ला पाणी पुरवठा आणि नलयोजना सुरू करण्यासाठी वीज वितरण महामंडळा विद्युत मिटर साठी डिमांड भरण्यात आले.

परंतु आजतागायत या नळ योजनेला मिटर मिळालाच नाही डिमांड भरले ते रुपये गेले कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे तसेच या योजनेला बांधकाम पूर्ण होऊनही स्विच रुम नाही परंतु नागरिकांच्या ओरडण्यामुळे पाणी पुरवठा समिती आणि ग्रा प ने डायरेक्ट वीज घेऊन नळ योजना सुरू केली आणि गावात पाणी पुरवठा केला परंतु मागील 15 दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे गावकरी पाण्यासाठी वणवण करीत आहेत
सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यासाठी दोन कंत्राटदार यांनी कसें बसे काम पूर्ण केले पाण्याच्या टाकीला झाकण सुद्धा लावले नाही तसेच पुराचे पाणी विहिरी जात आहे आणि पाणी वाहिनी पाईप शेतात फुटल्यामुळे पाणी व्यस्त जात आहे त्यामुळे गडुळ पाणी नळा ला येत होते या गडुळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

या सर्व बाबीकडे ग्रापंचायतीचे दुलक्ष होत आहे सदर योजना ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आली आहे पण ग्रामपंचायत म्हणते की हस्तांतरण झालेच नाही आणि पाणीपुरवठा समिती बरखास्त करून ग्रामपंचायतला या योजनेची देखभाल करण्यासाठी देण्यात आली आहे परंतु मागील पंधरा दिवसांपासून पाणी बंद असल्यामुळे पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अर्ध्या पेक्षा जास्त नळ धारकांना एक थेंब पाणी सुध्दा येत नाही या संदर्भात ग्रा प ला अनेकदा सूचना अर्ज देऊनही नळ बंद आहेत त्यामुळे आज शिवणपायली येथील नागरिकांनी ग्रा प कार्यालय गाठून पाणी पुरवठा योजना सुरू करून द्यावी अशी तंबी देत निर्वानी चा इशारा दिला अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा शिवणपायली येथील नागरिकांनी दिला आहे