देशातील मोदी सरकारला सडेतोड उत्तर देण्यासाठी हल्लाबोल मोर्च्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहा — विजय अंभोरे

25

🔹काँग्रेस अनु जाती विभाग राज्यकार्यकारणीची संसद घेराव पूर्वनियोजन आढावा बैठक संपन्न

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.8ऑगस्ट):-देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखाली काम करणारे , नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून देशासह राज्यभरात विविध ठिकाणी दलीत अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून ,दलीत अन्याय व अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संसदेवर दिनांक :12 ऑगस्ट ला हल्लाबोल महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संसद घेराव महामोर्चाचे पूर्वनियोजन करण्यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्टाचे प्रभारी मनोज बागरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या राज्य कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली.

यावेळी संसद घेराव पूर्वनियोजन बैठकीस उपस्थित राज्यभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी सांगितले की ,”देशात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वातील मनमानी राजवट येथे चालू आहे.देशासह राज्यभरात विविध ठिकाणी दलीत अन्याय व अत्याचाराची परिशीमा झाली असून ,आत्ता ही राजवट हाणून पाडण्यासाठी व दलीत विरोधी केंद्र सरकारला सडेतोड उत्तर देण्यासाठी राज्यभरातील सर्व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी ,सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी आत्ता दिल्ली वर आगेकूच करण्याची काळाची गरज आहे. या देशव्यापी आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे .यावेळी , प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे, प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे, महीलाआघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिमा ऊके ,प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार सह सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य, राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष , कार्याध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .