रयत शेतकरी संघटनेचा विभागीय मेळावा साईबाबा शिर्डी येथे पार पडणार- सुनील ठोसर

106

✒️प्रतिनिधी गेवराई(नवनाथ आडे)

गेवराई(दि.२१ऑगस्ट):- महाराष्ट्र रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अँड. रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनखाली प्रदेश कार्याध्यक्ष मा. तय्यब पटेल साहेब, महिलाप्रदेश अध्यक्ष अँड. नयना ताई गवळी, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुखदेव भालेराव, प्रदेश महिला उपाध्यक्ष पूजा ताई उद्घुट्टे तसेच पश्चिम विभाग प्रमुख सौ.राणी ताई चव्हाण, , उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. सुनील देवरे , पुणे जिल्हा अध्यक्ष व संपर्क प्रमुख रामदास कोतवाल हे उपस्थित राहणार असून त्यांचे मार्गदर्शन होणार आहे सदर मेळाव्याचे नियोजन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शुभम तायडे यांनी केले आहे.

तरी आपण मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे ही विनंती. स्थळ:श्री क्षेत्र साई बाबा शिर्डी येथील हॉल मध्ये
दिनांक 28/08/2021 शनिवार रोजी ठीक 11 वाजता (महाराष्ट्रातील सर्व विभाग प्रमुख तथा विभागीय पदाधिकारी, जिल्हा प्रमुख तथा जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख तथा तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी आदी सर्कल प्रमुख सर्वांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या आजपर्यंत केलेल्या कामाचा तपशील सादर करून आपल्या पातळीवर पाहिजे त्या उपाय योजना आढावा सादर करून राज्यातील विविध भागात नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

सर्वत्र सामान्य जनतेचे प्रश्न गंभीर आहे राज्यात अनेक कारखाने, अनेक सहकारी संस्था बंद करून यावर कुणीही बोलायला तयार नाही, सर्व राजकीय पक्षांना येणाऱ्या निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत यासाठी कुठलीही प्रतिक्रिया न देता आपल्याला अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत राज्यात निवडणुकीचे वातावरण कुठलेही काम न करता तापण्याचे वाटू लागले आहे, नुसता भूलथापा, पावसाळ्यात नुसता भूलथापा चा पाऊस पडत आहे यावर रयत शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी जातीने हजर राहून या मेळाव्याचे साक्षीदार व्हावे) असे आवाहन सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे