वर्धनगड घाटात तीव्र उतारावर आकार घेतय धोकादायक वळण

28

✒️खटाव-सातारा प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.24डिसेंबर):-लातूर हा महामार्ग तयार होत आहे त्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे तीव्र उतार झाला असून, अतिशय धोकादायक वळण तयार झाले आहे. या ठिकाणी अपघाताची होण्याची शक्यता वाहन चालकाकडून वर्तवण्यात येत असून या वळणावर वेळेवर उपाय केल्यास संभाव्य धोके टळू शकतात.राजधानीचे प्रवेशद्वार म्हणून इतिहासात नामोलेख असलेल्या वर्धनगड, हा घाट आहे.

सातारा जिल्ह्यातील ,सातारच्या पूर्वेला 30 किलोमिटर अंतरावर वर्धनगड घाट लागत असून नव्याने तयार होत असलेला महामार्ग क्रमांक 65 वर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असून पंढरपूर,सोलापूर,लातूर,अक्कलकोट,उस्मानाबाद,या ठिकाणाहून,सातारा कडे वाहने येत जात असतात. वर्धनगड घाटात तीव्र उतार यामुळे अपघात होण्याची शक्यता असून ते धोकादायक वळण काढून टाकण्याची मागणी गाडी चालकांकडून होत आहे