भारतीय बांधवांना परदेशी वास्तव्य मुबारक!

58

(प्रवासी भारतीय दिन विशेष)

प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय- मिनीस्ट्री ऑफ ओव्हरशीज इंडियन अफ्फेअर्स व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय- मिनीस्ट्री फॉर डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्टर्न रेजियन, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या मार्फत केले जाते. ७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजित केले जातात. सन २०१४ सालच्या बाराव्या प्रवासी भारतीय दिवसाला ५१ देशांमधील सुमारे १,५०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महत्त्वपूर्ण संकलित माहित श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दांत वाचा…

भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांना ८ जानेवारी २००२ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात समितीचा अहवाल प्राप्त झाला आणि दि.९ जानेवारी २००२ रोजी या प्रवासी भारतीय दिवस- पीबीडीची घोषणा केली. भारतामध्ये मोठ्यासंख्येने लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये गेलेले आहेत. त्यातील बरेच भारतीय तिथेच स्थायिक झालेले आहेत. या भारतीयांनी या देशांमध्ये राहताना आपली प्रगती करून घेतलीच, पण त्याचसोबत ते राहत असलेल्या देशांच्या विकासामध्ये मौलिक योगदान दिले आहे. अशा जगभरात पसरलेल्या अनिवासी भारतीयांना आपला मूळ देश असलेल्या भारताशी जोडून घेण्यासाठी एक नवा विचार पुढे आला. त्यातूनच प्रवासी भारतीय दिन या संकल्पनेचा जन्म झाला. भारत सरकारकडून दरवर्षी ९ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो.

पहिला प्रवासी भारतीय दिवस ९ ते ११ जानेवारी या कालावधीत २००३ साली साजरा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेतून या दिवसाची सुरूवात करण्यात आली. आपल्या देशातून अन्य देशात गेलेल्या भारतीय लोकांनी आपल्या मूळ भूमीशी आणि संस्कृतीशी जोडले जावे, त्यांच्याशी असलेले संबंध अधिक दृढ व्हावेत, हा या मागील हेतू होता. प्रवासी भारतीय दिनी विदेशात राहून विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणार्‍या भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनात भारताविषयी काय भावना आहे? जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताने आणखी काय करायला हवे? भारत आणि इतर देश यांच्यामध्ये काय समान धागे आहेत? अशा अनेक गोष्टींचे वैचारिक आदान प्रदान व्हावे, त्यासाठी हे प्रवासी दिन हे व्यासपीठ आहे. यामध्ये विशेषत: तरुण वर्गाला अनिवासी भारतीयांकडून मार्गदर्शन केले जाते. विदेशातील नव्या संंधींबद्दल यांना माहिती मिळते. अनिवासी भारतायींच्या माध्यमातून भारतात नवी व्यावसायिक गुंतवणूक आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातो.

प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय- मिनीस्ट्री ऑफ ओव्हरशीज इंडियन अफ्फेअर्स व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय- मिनीस्ट्री फॉर डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्टर्न रेजियन, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या मार्फत केले जाते. ७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजित केले जातात. सन २०१४ सालच्या बाराव्या प्रवासी भारतीय दिवसाला ५१ देशांमधील सुमारे १,५०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रवासी भारतीय दिन सुरू करण्याचे श्रेय लक्ष्मीमल सिंघवी समितीला जाते.

भारत सरकारकडून प्रवासी भारतीय पुरस्कार दिला जातो. विदेशात उत्तम कामगिरी करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. भारतीय लोक विदेशात मोठ्या संख्येने स्थायिक होत आहेत. आता जग हे आधुनिक वाहतूक आणि दूरसंपर्क यंत्रणांनी जोडले गेले आहे. असे असतानाच भारतात अजून बर्‍याच पायाभूत सुविधांची गरज आहे. भारत खेड्यांचा देश आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही खेडोपाडी वसलेली आहे. त्या सगळ्यांपर्यंत अजून बर्‍याच पायाभूत सुविधा पोहोचण्याची गरज आहे. प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याचा उद्देश- परदेशी भारतीयांना देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जेणेकरून परदेशातील भारतीयांचे नेटवर्क तयार होईल, भारतीय तरुणांना परदेशी भारतीयांशी जोडणे, परदेशातील भारतीय समुदाय फायदेशीर उपक्रमांसाठी देशातील सरकार आणि नागरिकांशी सहज संपर्क साधणे, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, हे देखील मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे.

प्रवासी भारतीय दिवसातील काही प्रमुख तथ्ये- अनिवासी भारतीयांना भारताविषयी त्यांच्या भावना, दृष्टिकोन आणि धारणा व्यक्त करण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जगातील सर्व देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे आणि तरुण पिढीला स्थलांतरितांशी जोडणे. या दिवशी सरकार डायस्पोरांना त्यांच्या मुळाशी जोडण्यावर लक्ष केंद्रित करते जेणेकरून ते देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील. प्रवासी भारतीय दिवस परिषद नवी दिल्लीत पार पडली. प्रादेशिक प्रवासी भारतीय दिवस भारताबाहेर सुद्धा आयोजित केला जातो. पीबीडीच्या अधिवेशनात पात्र व्यक्तींना बक्षिसे दिली जातात. पीबीडीचा मुख्य उद्देश भारतीय डायस्पोरा जोडणे आहे.

भारताचे विद्यमान पंतप्रधान जेव्हा विदेशी दौर्‍यावर जातात, तेव्हा तेथील भारतीयांना भेटत असतात. मा.नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा अनिवासी भारतीय आणि भारत यांच्यामध्ये जास्तीत जास्त संबंध येण्यासाठी तसेच विदेशातील भारतीयांना भारताशी जोडण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला. त्यातून हाऊडी मोदी यासारख्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातून मा.मोदींनी अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांना प्रभावीत केले होेेते. त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर जगातील अनेक देशांचे दौरे केले. त्यांनी तिथे राहणार्‍या भारतीयांचे मोठे मेळावे घेतले. त्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. या दिवसाचे महत्त्व असे- अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले उपकार आणि योगदान लक्षात ठेवणे, सन १९१५मध्ये या दिवशी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांचे जीवन कायमचे बदलले होते, म्हणूनच आपला देश हा दिवस साजरा करत आहे.

!! परदेशात वास्तव्यास असणाऱ्या सर्व भारतीय बांधवांना प्रवासी भारतीय दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६