चंद्रपूर जिल्ह्यात (दि.9मे) रोजी 24 तासात 2151 कोरोनामुक्त, 1180 कोरोना पॉझिटिव्ह तर 22 कोरोना बधितांचा मृत्यू

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 2151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1180 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 71 हजार 728 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 56 हजार 599 झाली आहे. सध्या 14 हजार 27 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 12 हजार 583 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 36 हजार 639 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष, महाकाली वार्ड येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, नेहरू नगर वार्ड परिसरातील 70 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 60 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, जीवन ज्योती कॉलनी रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष.
राजुरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष.
ब्रह्मपुरी तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष, चिखल परसोडी येथील 62 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील 62 वर्षीय पुरुष, करंजी येथील 60 वर्षीय पुरुष.चिमूर तालुक्यातील काजळसर येथील 35 वर्षीय महिला.वरोरा तालुक्यातील 42 व 50 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1102 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1017 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 34, यवतमाळ 34, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1180 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 374, चंद्रपूर तालुका 58 , बल्लारपूर 114, भद्रावती 91, ब्रम्हपुरी 35, नागभिड 27, सिंदेवाही 12, मूल 125, सावली 35, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 49, राजूरा 50, चिमूर 25, वरोरा 105, कोरपना 53, जिवती 07 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात (दि.9मे)रोजी 504 कोरोनामुक्त, 14 मृत्यूसह 427 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.9मे):- आज जिल्हयात 427 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 504 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25445 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 20735 वर पोहचली. तसेच सद्या 4168 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 542 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 14 नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 39 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथील 64 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.49 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.38 टक्के तर मृत्यू दर 2.13 टक्के झाला.

नवीन 427 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 131, अहेरी तालुक्यातील 35, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 44, धानोरा तालुक्यातील 28, एटापल्ली तालुक्यातील 25, कोरची तालुक्यातील 4, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 30, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 35 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 35 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 504 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179, अहेरी 37, आरमोरी 45, भामरागड 7, चामोर्शी 51, धानोरा 21, एटापल्ली 46, मुलचेरा 15, सिरोंचा 36, कोरची 6, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 33 जणांचा समावेश आहे